रासेयो पथकाने बांधला गावालगत वनराई बंधारा
By Admin | Updated: December 10, 2014 23:01 IST2014-12-10T23:01:10+5:302014-12-10T23:01:10+5:30
येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने

रासेयो पथकाने बांधला गावालगत वनराई बंधारा
अर्जुनी/मोरगाव : येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने अरततोंडी/दाभना लगतच्या वन परिसरात वन्य प्राणी व शेतकरी यांना पाणी मिळावे या दृष्टीने लगतच्या नाल्यावर श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
रासेयो पथकाच्या शिबिराचे उद्घाटन को-आॅप. बँकेचे संचालक भोजराज रहिले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सरिता पातोडे होत्या. तर उपसरपंच मोरेश्वर रहिले, उपप्राचार्य वीणा नानोटी, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद हत्तीमारे, प्राथ. शाळा मुख्याध्यापिका आर.व्ही. गोंडाणे, भागवत मुनेश्वर, लीला ब्राह्मणकर, सुनीता मेश्राम, संदीप उईके, रासेयो प्रभारी प्रा. जे.डी. पठाण, प्रा. आर.व्ही. सूर्यवंशी, प्रा.ए.एम. नंदेश्वर, प्रा.नंदा लाडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान रासेयोच्या पथकाने नाल्याचे खोदकाम, गटारे स्वच्छ, रस्त्यांची डागडुजी इत्यादी कामे केली. बौद्धिक कार्यक्रमांतर्गत प्रा.ओ.डी. लांजेवार यांनी पर्यावरण व मानवी जीवन, प्रा. एस.जी. भोयर यांनी मानवी मूल्य व राष्ट्रीय सेवा योजना तर आरोग्य सेवक पी.एस. पातोडे यांनी स्वच्छता आणि आरोग्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. एस. एस.जे. महाविद्यालयाचे प्रा. शरद मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक सामाजिक क्रांतीचे पर्व या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पारस वंजारी, शिवानी जांभुळकर व इतर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
रासेयो शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सरपंच सरिता पातोडे यांच्या अध्यक्षतेत महागाव येथील शामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.बी.जी. पटले, शामराव बहेकार, जे.एस. राठी यांच्या उपस्थितीत पार पडला. सात दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पठाण, प्रा. अनिल नंदेश्वर, प्रा. रामदास सूर्यवंशी, प्रा. यादोराव बुरडे, प्रा. नंदा लाडसे, प्रा. योगेंद्र गौतम, प्रा. टी.एस. बिसेन, प्रा.संदीप भोयर, प्रा. कांबळे, रासेयो पथकाचे विद्यार्थी व अरततोंडी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन रासेयो पथक विद्यार्थी अंशुल भोवते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. जे.डी. पठाण यांनी मानले.