शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाऊस सरासरी गाठतोय पण दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 5:00 AM

मागील दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही. परिणामी, सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्येसुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

ठळक मुद्देरोवणीला आला वेग : मात्र सिंचन प्रकल्पात मोजकाच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तब्बल पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात पावसाने दोन दिवस हजेरी लावली. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने पावसाने सरासरी जरी गाठली असली तरी अद्यापही पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.मागील दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही. परिणामी, सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्येसुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५१४.० मिमी पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ४६४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या ९०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे १० टक्के पावसाची तूट अजूनही कायम आहे. जुलै महिना संपण्यास पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून पाऊस कमी होतो. यंदा आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच रोवण्या झाल्या आहेत. तर ७० टक्के रोवण्या शिल्लक आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांच्या रोवण्या आटोपल्या आहेत. पण वर थेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा हवामान विभागाचा अंदाज सुरुवातीपासूनच फोल ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे. 

५५ हजार हेक्टरवर राेवण्या पूर्ण यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. यापैकी २४ जुलैपर्यंत ५५ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून, अजून १ लाख २६ हजार हेक्टरवरील रोवण्या होणे शिल्लक आहे. त्यामुळे रोवणीला वेग येण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती