शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वणवा थांबविण्यासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:15 IST

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो.

ठळक मुद्देवन व्यवस्थापन समितीचा पुढाकार : नागरिकांना वन कायद्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलातआग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. या सर्व बाबी लक्षात घेता वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने जंगलातील वनवा थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.येथील वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती (नवाटोला) तसेच बिजेपार येथील समिती गावागावात जाऊन लोकांशी संपर्क करीत गावात सभा व बैठका आयोजित करुन गावकऱ्यांना समजाविण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहेत.जंगलाला वनवा लागला तर वन संपत्तीचे मोठे नुकसान होते. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका मानवी जीवनावर सुद्धा पडतो आणि वनोपजावर अवलंबित गावांना याचा परिणाम सुद्धा भोगावा लागतो. कारण की वनातून मिळणाºया उत्पादनापासून अनेकांना रोजगार सुद्धा मिळतो. परंतु काही लोक वन संपत्तीचा महत्व न समजता वनात आग लावण्याची चूक करतात याबाबत समजाविले जात आहे.वन व्यवस्थापन समिती आणि वनकर्मचारी, वनात आग लावणे कायद्यान्वये गुन्हा असून गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपी शिक्षेस पात्र ठरु शकतो. अशात लोकांनी कायद्याचे उलंघन करु नये याबाबतही समजावून सांगत आहेत.जनजागृती करणाऱ्यांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे, सचिव (वनरक्षक) सुरेश रहांगडाले, कोषाध्यक्ष संतोष कोडवती, सदस्य महेश वरकडे व इतर सदस्य सहकार्य करीत आहेत. याशिवाय नवाटोला येथील काही सुज्ञ नागरिक सुद्धा इतर गावातील अनेक लोकांना आग लागल्यापासून जंगलाना वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचप्रमाणे बिजेपार परिसरातील समितीचे लोक आणि वन कर्मचारी सुद्धा गावागावात जनजागृती करीत आहेत.ती आग विझविण्यात यशमागील आठवड्यात एफडीसीएमच्या कक्ष क्र.४६५ मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना घडली. परंतु संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग तसेच एफडीसीएमच्या कर्मचाºयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवित आग विझविली व मोठे नुकसान टाळले. या मोहिमेत गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केले.कशामुळे लागतो वणवा?जंगलात मोहफुल वेचणारे लोक मोहाच्या झाडाखालील परिसरात स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळा जाळतात. परंतु तो पाला पाचोळा जळताना संपूर्ण जंगलात आग पसरते. याशिवाय गुरे चारणारे किंवा वनोपज संकलित करण्यासाठी जंगलात भटकणारे लोक जंगलात आग लावण्यास कारणीभूत असतात. परंतु त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वनस्पती, किमती लाकडे आणि शेकडो वन्यजीवांना धोका निर्माण होतो. बिळात राहणारे व सरपटणारे जीव आपला प्राण गमावून बसतात. आगीत हिरवी वनस्पतीसुद्धा जळून गेल्याने एकीकडे झाडांचे नुकसान होतो तर त्यासोबतच तृणभक्षी प्राण्यांचा चारा सुद्धा हिरावतो.

टॅग्स :forestजंगलfireआग