भडकणाऱ्या आगीपासून वन संपदेचे रक्षण करा
By Admin | Updated: February 2, 2016 01:42 IST2016-02-02T01:42:00+5:302016-02-02T01:42:00+5:30
जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे.

भडकणाऱ्या आगीपासून वन संपदेचे रक्षण करा
ुउपवनसंरक्षक रामगावकर : ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन
गोंदिया: जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समुद्ध आहे. बहुमूल्य असलेली वनसंपदा जिल्ह्यातील वनात आहे. वनाची सीमा दूरवर पसरलेली असल्यामुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्य तत्परतेने काम करीत आहे. वनसंपदेचे रक्षण करणे आणि वनाला आगीपासून वाचविणे हे आज प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. वन विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाला ग्रामीण वनलगतच्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीशिवाय वनसंपदेचे संरक्षण व वनाचे आगीपासून रक्षण करणे कठिण काम आहे.
दरवर्षी १५ फेब्रूवारी ते १५ जून या कालावधीतील भीषण उन्हाळ्यात वनात आग लागण्याच्या थटना घडत असतात. या आगीमुळे वनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वनसंपदा जळून नष्ट होते. वन्यजीव होरपळून मरतात. मोठ्या प्रमाणात संपूर्ण भुभागावर कायमस्वरुपी दुष्टपरिणाम टाळण्याकरिता या वर्षात वनात कमीत कमी आगीच्या घटना घडाव्यात यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सज्ज आहे. वनात लागणाऱ्या आगीच्या घटनेची सुचना जवळच्या परिक्षेत्र किंवा उपक्षेत्र कार्यालयाला त्वरीत ग्रामस्थांनी दयावी. वनात अग्नीजन्य साहित्य घेऊन वावरु नये, वनक्षेत्रात आग लावणे, अवैध वृक्षतोड, चोरटी वाहतूक वा वन्यजीवाची शिकार करणे याकरिता जर कुणीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास त्याबाबत वन विभागास गुप्त माहिती पुरविण्यात यावी. माहिती पुरविणाऱ्यांचे नाव गुप्त राखण्यात येईल व यथायोग्य बक्षीस सुद्धा देण्यात येईल. वनसंपदेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे व त्याकरिता वनलगतच्या ग्रामस्थांनी तसेच नागरिकांनी वन विभागाला स्वयंस्फुर्तीने बहुमूल्य सहकार्य करावे असे आवाहन, वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.