शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित; भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:07 IST

पिपरिया येथील शेतकऱ्यांची दुसरी पिढीही हतबल : मोबदला न मिळाल्यास कालवा बुजविणार

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील पिपरीया परिसरात १९८५ ते १९८१ या काळात लघु पाटबंधारे विभागाने आमानारा तलावाचे बांधकाम पूर्ण केले. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा तयार केला. कालव्यासाठी ज्या शेतकऱ्यांची शेतमीन संपादित केली, त्यांना जमिनीचा मोबदला देणे अनिवार्य होते. पण काम पूर्ण होऊन ५० वर्षे लोटली तरी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही.

यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण त्यांच्या वारसदारांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही. उलट जमीन न राहता संपादित झाल्यामुळे ते भूमिहीन व अत्यल्पभूधारक झाले आहेत. परिणामी या शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोलमजुरी करून जीवन जगण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात वारंवार संबंधित विभाग व शासनाकडे पत्रव्यवहार केला, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शासनाने आम्हाला जर संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला पंधरा दिवसांत दिला नाही तर आमच्या शेतातून कालवा बुजवण्याची तयारी करू, असा इशारा असा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे. तलाठी कार्यालय पिपरीया येथे या कालव्याच्या कामासाठी १८ खातेदारांची जमीन व लगान कमी करण्याबाबतचा उपजिल्हाधिकारी व विशेष भुअर्जन अधिकारी ४ गोंदिया यांनी तलाठी पिपरिया यांना दिलेला पत्र क्रमांक १३५/८२ असून त्यात यादीत मामला क्रमांक ३८/अ-६५/८०- ८१ असे नमूद आहे. तहसील कार्यालय सालेकसा येथून फेरफार नोंदणी क्रमांक ४२७ दि. ८/४/१९८८ ला झालेल्या फेरफार नोंदवहीची नक्कल या दोन्ही कागदपत्रांत साम्य आहे. या संपादित जमीन ७/१२ व ई.प्र. पाटबंधारे विभागाच्या नावे रुजू झाले आहे. त्या यादीतील १ ते १० खातेदारांची भूसंपादन नसती असून संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिल्याची नोंद नाही. २०१५ ते २०१९ या कार्यकाळात तत्कालीन आ. संजय पुराम यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर देण्याकरिता विभागीय कार्यालयाद्वारे प्रश्नांची प्रत परावर्तीत केली. त्यातही संबंधित विभागांकडून निश्चित उत्तर न देता शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. 

तर आक्रमक पावित्रा घेऊहक्काच्या जमिनीच्या मोबदल्याची वाट पाहता-पाहता शेतकऱ्यांची एक पिढी संपून गेली व दुसरी पिढी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे. ही प्रतीक्षा संपणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. तसेच पंधरा दिवसांत जमिनीचा मोबदला न मिळाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

"शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांची मागणी अतिशय रास्त असून संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह चर्चा करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देणार."- संजय पुराम, आमदार

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजना