शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित; भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:07 IST

पिपरिया येथील शेतकऱ्यांची दुसरी पिढीही हतबल : मोबदला न मिळाल्यास कालवा बुजविणार

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील पिपरीया परिसरात १९८५ ते १९८१ या काळात लघु पाटबंधारे विभागाने आमानारा तलावाचे बांधकाम पूर्ण केले. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा तयार केला. कालव्यासाठी ज्या शेतकऱ्यांची शेतमीन संपादित केली, त्यांना जमिनीचा मोबदला देणे अनिवार्य होते. पण काम पूर्ण होऊन ५० वर्षे लोटली तरी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही.

यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण त्यांच्या वारसदारांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही. उलट जमीन न राहता संपादित झाल्यामुळे ते भूमिहीन व अत्यल्पभूधारक झाले आहेत. परिणामी या शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोलमजुरी करून जीवन जगण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात वारंवार संबंधित विभाग व शासनाकडे पत्रव्यवहार केला, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शासनाने आम्हाला जर संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला पंधरा दिवसांत दिला नाही तर आमच्या शेतातून कालवा बुजवण्याची तयारी करू, असा इशारा असा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे. तलाठी कार्यालय पिपरीया येथे या कालव्याच्या कामासाठी १८ खातेदारांची जमीन व लगान कमी करण्याबाबतचा उपजिल्हाधिकारी व विशेष भुअर्जन अधिकारी ४ गोंदिया यांनी तलाठी पिपरिया यांना दिलेला पत्र क्रमांक १३५/८२ असून त्यात यादीत मामला क्रमांक ३८/अ-६५/८०- ८१ असे नमूद आहे. तहसील कार्यालय सालेकसा येथून फेरफार नोंदणी क्रमांक ४२७ दि. ८/४/१९८८ ला झालेल्या फेरफार नोंदवहीची नक्कल या दोन्ही कागदपत्रांत साम्य आहे. या संपादित जमीन ७/१२ व ई.प्र. पाटबंधारे विभागाच्या नावे रुजू झाले आहे. त्या यादीतील १ ते १० खातेदारांची भूसंपादन नसती असून संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिल्याची नोंद नाही. २०१५ ते २०१९ या कार्यकाळात तत्कालीन आ. संजय पुराम यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर देण्याकरिता विभागीय कार्यालयाद्वारे प्रश्नांची प्रत परावर्तीत केली. त्यातही संबंधित विभागांकडून निश्चित उत्तर न देता शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. 

तर आक्रमक पावित्रा घेऊहक्काच्या जमिनीच्या मोबदल्याची वाट पाहता-पाहता शेतकऱ्यांची एक पिढी संपून गेली व दुसरी पिढी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे. ही प्रतीक्षा संपणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. तसेच पंधरा दिवसांत जमिनीचा मोबदला न मिळाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

"शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांची मागणी अतिशय रास्त असून संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह चर्चा करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देणार."- संजय पुराम, आमदार

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजना