शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस राहणार सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:37 PM

शिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते.

ठळक मुद्देठाणेदार चव्हाण घेतील पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची वेळेवर नोंद

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कशिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते. हे होऊ नये लोकाभिमुख प्रशासन चालवे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण म्हणाले.नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव हे पोलीस ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी एक मानले जाते.येथील जनतेने ज्या पोलीस अधिकाऱ्याला साथ दिली त्याला चांगली साथ मिळते. ज्या पोलीस अधिकाºयाला असहकार्य मिळते त्याला निलंबनालाही सामोरे जावे लागते. पोलीस ठाण्याच्या कारभार सांभाळण्याची जबाबदारी १३ वर्षापासून पोलीस दलात अविरत सेवा देणाºया पोलीस निरीक्षक सुभाष सदाशिव चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली. १३ वर्षापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सहभागी झालेल्या सुभाष चव्हाण यांच्यावर आमगाव पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली. लोकमतने घेतलेल्या त्यांच्या या मुलाखतीत त्यांनी नागरिकांच्या तक्रारीला वेळेवर नोंदणी करू,जेणे करून त्या प्रकरणात तपासाला गती मिळेल आणि पिडीतेला न्याय मिळेल असे सांगितले.पोलीस प्रशासन लोकाभिमुख राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेत प्रथम प्राधान्य सुव्यवस्थेला देतो. सुव्यवस्था असली तर कायद्याचे राज्य निर्माण होते. गुन्हे प्रतिबंधक आपल्याला संकल्पना राबवायची आहे. सतर्कता ठेवल्यास अनेक गुन्हे सहजरित्या टाळता येतात. ते गुन्हे घडूच नये यासाठी आपण आणि आपली पोलीस यंत्रणा काम पाहणार आहे. बºयाचदा गुन्हा घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर जातात. परंतु गुन्हा घडण्याची शक्यता असल्यास त्या ठिकाणी आधीच पोलीस पोहचली तर गुन्हा घडायला वाव राहात नाही. गुन्ह्यांना आळा बसावा यावर जोर दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने राज्यात आपले नाव लौकीक केले आहे. गावातील भांडण तंटे गावातच सामोपचाराने सोडविता यावे यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घ्यावा. जातिय सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. समाजात धार्मिक, जातिय, हिंदू-मुस्लीम असे तेढ निर्माण होऊच नये यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. गुण्यागोविंदातून लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लावण्यासाठी जनता आणि पोलीस यांच्यात सलाख्याचे संबध कायम ठेवण्यात यशस्वी राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी, या अवैध धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्यासाठी आपण व पोलीस यंत्रणा प्रयत्न करेल. जनतेच्या समस्या, गाऱ्हाणी यांचे निराकरण वेळेवर करण्यावर भर दिला जाणार आहे. आमगाव तालुक्यातील सर्व गावे शांततेचे पुरस्कर्ते व्हावेत, तंटामुक्त झालेल्या गावात तंटे नकोत यासाठी भांडण-तंटे घडूच नये यासाठी लोकांना मार्गदर्शन करून गावाला शांततेतून समृध्दीकडे जाण्याच्या मार्गात पोलीस विभागही त्यांच्या मदतीला आहे. बेरोजगार तरूणांना जीद्द, चिकाटीतून पुढे कसे जाता येते यावर मार्गदर्शन करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊ,इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनाचे ब्रीद असलेल्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ चे तंतोतंत पालन करून गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा व्हावीच या दिशेने आपले कामकाज असणार असल्याचे आमगावचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस