शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पीएम किसान'चे लाभार्थी निम्यावर; २ लाख शेतकरी कमी झाल्याची आली बाब पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:48 IST

तब्बल दोन लाखांनी संख्या घटली : १८ हप्ता केवळ ७९,६३२ शेतकऱ्यांना

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सुरुवातीला या योजनेचा लाभ मिळणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या २ लाख ८० हजार ४८६ होती ती आता १८ हप्त्यापर्यंत ७९ हजार ६३२ वर आली आहे. त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या निम्यावर आली असून, विविध निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे पुढे आले आहे.

पीएम किसान ही एक केंद्रीय योजना असून, या योजनेचा निधी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. या योजनेंतर्गत, दरवर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना दिले जाते. सुरुवातीला या योजनेचा लाभघेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. आयकर भरणारे, नोकरीवर असलेले तसेच एकाच कुटुंबातील तीन चार व्यक्ती याचा लाभ घेत होते. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी शासनाने सर्वेक्षण मोहीम राबवून योजनेसाठी पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना यातून वगळले. त्यामुळे पहिला हप्ता झाला तेव्हा शेतकऱ्यांची संख्या २ लाख ८० हजार ४८६ होती. ती १८ हप्त्याच्या वेळी ७९,६३२वर आली आहे. जवळपास दोन लाख शेतकरी कमी झाल्याची बाब पुढे आली आहे.

सर्वेक्षण मोहिमेने गळतीपीएम किसान योजनेचे लाभ अनेक अपात्र शेतकरी घेत होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने सर्वेक्षण मोहीम राबवून यातून अपात्र शेतकऱ्यांना वगळले. त्यामुळे योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निम्यावर आल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पी.एम. किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावीपात्र लाभार्थीनी आधार कार्ड, नागरिकत्वाचा पुरावा, त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे, त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री-किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री-किसान पोर्टलला भेट द्यावी आणि ऑनलाइन नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवासयी केली नाही त्यांच्या बँक खात्यावर हप्त्याची रक्कम जमा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

१६५४ शेतकऱ्यांकडून दीड कोटी वसूलपीएम किसान योजनेचा लाभ आयकर भरणारे व नोकरीवर असणारे लाभार्थी सुध्दा घेत होते. सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून १६५४ शेतकऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उचल केलेल्या हप्त्याचे दीड कोटी रुपये वसूल करण्यात आले. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजनाgondiya-acगोंदिया