शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान'चे लाभार्थी निम्यावर; २ लाख शेतकरी कमी झाल्याची आली बाब पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:48 IST

तब्बल दोन लाखांनी संख्या घटली : १८ हप्ता केवळ ७९,६३२ शेतकऱ्यांना

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सुरुवातीला या योजनेचा लाभ मिळणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या २ लाख ८० हजार ४८६ होती ती आता १८ हप्त्यापर्यंत ७९ हजार ६३२ वर आली आहे. त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या निम्यावर आली असून, विविध निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे पुढे आले आहे.

पीएम किसान ही एक केंद्रीय योजना असून, या योजनेचा निधी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. या योजनेंतर्गत, दरवर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना दिले जाते. सुरुवातीला या योजनेचा लाभघेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. आयकर भरणारे, नोकरीवर असलेले तसेच एकाच कुटुंबातील तीन चार व्यक्ती याचा लाभ घेत होते. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी शासनाने सर्वेक्षण मोहीम राबवून योजनेसाठी पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना यातून वगळले. त्यामुळे पहिला हप्ता झाला तेव्हा शेतकऱ्यांची संख्या २ लाख ८० हजार ४८६ होती. ती १८ हप्त्याच्या वेळी ७९,६३२वर आली आहे. जवळपास दोन लाख शेतकरी कमी झाल्याची बाब पुढे आली आहे.

सर्वेक्षण मोहिमेने गळतीपीएम किसान योजनेचे लाभ अनेक अपात्र शेतकरी घेत होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने सर्वेक्षण मोहीम राबवून यातून अपात्र शेतकऱ्यांना वगळले. त्यामुळे योजनेच्या लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निम्यावर आल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पी.एम. किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावीपात्र लाभार्थीनी आधार कार्ड, नागरिकत्वाचा पुरावा, त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे, त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री-किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री-किसान पोर्टलला भेट द्यावी आणि ऑनलाइन नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवासयी केली नाही त्यांच्या बँक खात्यावर हप्त्याची रक्कम जमा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

१६५४ शेतकऱ्यांकडून दीड कोटी वसूलपीएम किसान योजनेचा लाभ आयकर भरणारे व नोकरीवर असणारे लाभार्थी सुध्दा घेत होते. सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून १६५४ शेतकऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उचल केलेल्या हप्त्याचे दीड कोटी रुपये वसूल करण्यात आले. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजनाgondiya-acगोंदिया