शहरं
Join us  
Trending Stories
1
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
2
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
3
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
4
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
5
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
6
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
7
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
8
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
9
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
10
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
11
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
12
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
13
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
14
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
15
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
16
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
17
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
18
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
19
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
20
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?

परीक्षेच्या काळात तुमच्या मुलांच्या आहाराकडे असे द्या खास लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:34 IST

१८ हजार ५९३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा : ऐका तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांचा काळ जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संतुलित व पौष्टिक आहारावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे तणाव आणि अस्वस्थता वाढते. हे टाळण्यासाठी सकस आणि हलका आहार आवश्यक आहे. तसेच मनःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. परीक्षेच्या काळात खानपानाच्या वेळा नियमित असाव्या. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत नाश्ता, त्यानंतर चार ते साडेचार तासांनी दुपारचे जेवण घ्यावे.

काय खायला देऊ नये?परीक्षेच्या काळात तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावे. बाहेरचे जंकफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. साखरयुक्त शीतपेय.

१८ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षाजिल्ह्यातील १८ हजार ७९४ विद्यार्थी ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावी परीक्षेसाठी १८ हजार ५९२ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. 

काय खायला द्यावे?मुलांना हलका आहार द्यावा, लिंबूपाणी, ताक प्यायला द्यावे. त्यामुळे उत्साह वाढतो. तणाव व थकवा दूर होतो. नियमित आहारात बदल करू नये. प्रोटिन्स, झिंक, व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. 

अभ्यास एके अभ्यास नको!'अभ्यास महत्त्वाचा असला, तरी पुरेशी विश्रांती आणि झोप तितकीच गरजेची आहे. सतत अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहावे. सायंकाळी १५-२० मिनिटे चालल्याने उत्साह वाढतो आणि तणाव दूर होतो.

"परीक्षेच्या काळात पचायला जड अन्नपदार्थ नकोत. हिरवा भाजीपाला, दूध, सुकामेवा, फळांचा आहारात समावेश करावा. तिखट, मसालेदार व बाहेरचे अन्नपदार्थ टाळावे. पेपरला जाण्यापुर्वी पचायला जड आहार घेऊ नये. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरेशे पाणी प्यावे व हलक्या आहाराचा समावेश करावा."- डॉ. मोसमी ब्राम्हणकर, आहारतज्ज्ञ.

"परीक्षा काळात अभ्यासाला घेऊन विद्यार्थी तणावात असतात, मात्र मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या मनातील पेपरची भीती दूर करावी आणि त्यांना आत्मविश्वास द्यावा."- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :gondiya-acगोंदियाStudentविद्यार्थीEducationशिक्षण