शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

परीक्षेच्या काळात तुमच्या मुलांच्या आहाराकडे असे द्या खास लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:34 IST

१८ हजार ५९३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा : ऐका तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांचा काळ जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संतुलित व पौष्टिक आहारावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे तणाव आणि अस्वस्थता वाढते. हे टाळण्यासाठी सकस आणि हलका आहार आवश्यक आहे. तसेच मनःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. परीक्षेच्या काळात खानपानाच्या वेळा नियमित असाव्या. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत नाश्ता, त्यानंतर चार ते साडेचार तासांनी दुपारचे जेवण घ्यावे.

काय खायला देऊ नये?परीक्षेच्या काळात तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावे. बाहेरचे जंकफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. साखरयुक्त शीतपेय.

१८ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षाजिल्ह्यातील १८ हजार ७९४ विद्यार्थी ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावी परीक्षेसाठी १८ हजार ५९२ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. 

काय खायला द्यावे?मुलांना हलका आहार द्यावा, लिंबूपाणी, ताक प्यायला द्यावे. त्यामुळे उत्साह वाढतो. तणाव व थकवा दूर होतो. नियमित आहारात बदल करू नये. प्रोटिन्स, झिंक, व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. 

अभ्यास एके अभ्यास नको!'अभ्यास महत्त्वाचा असला, तरी पुरेशी विश्रांती आणि झोप तितकीच गरजेची आहे. सतत अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहावे. सायंकाळी १५-२० मिनिटे चालल्याने उत्साह वाढतो आणि तणाव दूर होतो.

"परीक्षेच्या काळात पचायला जड अन्नपदार्थ नकोत. हिरवा भाजीपाला, दूध, सुकामेवा, फळांचा आहारात समावेश करावा. तिखट, मसालेदार व बाहेरचे अन्नपदार्थ टाळावे. पेपरला जाण्यापुर्वी पचायला जड आहार घेऊ नये. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरेशे पाणी प्यावे व हलक्या आहाराचा समावेश करावा."- डॉ. मोसमी ब्राम्हणकर, आहारतज्ज्ञ.

"परीक्षा काळात अभ्यासाला घेऊन विद्यार्थी तणावात असतात, मात्र मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या मनातील पेपरची भीती दूर करावी आणि त्यांना आत्मविश्वास द्यावा."- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :gondiya-acगोंदियाStudentविद्यार्थीEducationशिक्षण