शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

परीक्षेच्या काळात तुमच्या मुलांच्या आहाराकडे असे द्या खास लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:34 IST

१८ हजार ५९३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा : ऐका तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांचा काळ जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संतुलित व पौष्टिक आहारावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे तणाव आणि अस्वस्थता वाढते. हे टाळण्यासाठी सकस आणि हलका आहार आवश्यक आहे. तसेच मनःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. परीक्षेच्या काळात खानपानाच्या वेळा नियमित असाव्या. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत नाश्ता, त्यानंतर चार ते साडेचार तासांनी दुपारचे जेवण घ्यावे.

काय खायला देऊ नये?परीक्षेच्या काळात तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावे. बाहेरचे जंकफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. साखरयुक्त शीतपेय.

१८ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षाजिल्ह्यातील १८ हजार ७९४ विद्यार्थी ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावी परीक्षेसाठी १८ हजार ५९२ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. 

काय खायला द्यावे?मुलांना हलका आहार द्यावा, लिंबूपाणी, ताक प्यायला द्यावे. त्यामुळे उत्साह वाढतो. तणाव व थकवा दूर होतो. नियमित आहारात बदल करू नये. प्रोटिन्स, झिंक, व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. 

अभ्यास एके अभ्यास नको!'अभ्यास महत्त्वाचा असला, तरी पुरेशी विश्रांती आणि झोप तितकीच गरजेची आहे. सतत अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहावे. सायंकाळी १५-२० मिनिटे चालल्याने उत्साह वाढतो आणि तणाव दूर होतो.

"परीक्षेच्या काळात पचायला जड अन्नपदार्थ नकोत. हिरवा भाजीपाला, दूध, सुकामेवा, फळांचा आहारात समावेश करावा. तिखट, मसालेदार व बाहेरचे अन्नपदार्थ टाळावे. पेपरला जाण्यापुर्वी पचायला जड आहार घेऊ नये. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरेशे पाणी प्यावे व हलक्या आहाराचा समावेश करावा."- डॉ. मोसमी ब्राम्हणकर, आहारतज्ज्ञ.

"परीक्षा काळात अभ्यासाला घेऊन विद्यार्थी तणावात असतात, मात्र मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या मनातील पेपरची भीती दूर करावी आणि त्यांना आत्मविश्वास द्यावा."- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :gondiya-acगोंदियाStudentविद्यार्थीEducationशिक्षण