शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन पती-पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 9:06 PM

मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात कोणताही अनोळखी पुरुष अथवा महिला आढळल्यास त्यांची विचारपूस न करता थेट संशय घेवून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान असाच संशय घेत पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री तालुक्यातील कुंभारटोली येथे घडली.प्राप्त माहितीनुसार कुंभारटोली येथे एका अनोळखी महिला व पुरुषाचा घेराव करुन बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन दोघांना जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान आमगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते दोघे पती-पत्नी असून गोंदिया जिल्ह्यातील अदासी (तांडा) येथील रहिवासी आहेत. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातील भंगार, खरडे, प्लास्टीक बॉटल इत्यादी गोळा करुन त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे आली. रुपचंद देशमुख (४०) व पत्नी कविता रुपचंद देशमुख (३५) अशी त्यांची नावे आहेत. ते कुंभारटोली परिसरात पोहोचले असता परिसरातील लोकांनी बालके चोरी करणारे असल्याच्या संशयावरुन कसलीही शहानिशा न करता मारहाण केली. बालकांची चोरी करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.अफवांना बळी पडू नकाजिल्ह्यात लहान बालकांचे अपहरण करुन त्यांचे अवयव चोरी करुन नेणारी टोळी सक्रीय असल्याची केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात न घेता पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.