येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शिक्षकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. जि ...
भाजप सरकारने राफेलविमान खरेदी जनतेच्या पैशांनी केली आहे. मात्र खरेदी प्रक्रियेत कित्येक काळे तथ्य सामोर येत आहेत. यामुळे देशातील जनतेसोबतच सेनेचेही मनोबल तुटत आहे. कॉँगे्रसच्या राज्यात ५०० कोटींत मिळणारे विमान भाजप सरकारच्या राज्यात १६०० कोटींचे कसे ...
आधारभूत हमी भाव धान खरेदी योजनेंतर्गत येथील आदिवासी विविध सेवा संघ केंद्रावरील गोदामाला नवेगावबांधच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी सील ठोकले. ही कारवाई सोमवारी (दि.२४) सायंकाळी करण्यात आली. ...
विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या सहायक शिक्षक एस.जी.टेंभुर्णीकर (५०) याला निलंबीत करा अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
मागील वर्षभरापासून जवळील ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात आश्रयाला असलेल्या मनोरूग्ण महिलेला येथील काही सामाजीक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले. शकुंतला घनश्याम देवर (३५,रा. कादोकला, जि.केऊझर, ओडीसा) असे त्या महिलेचे नाव आहे ...
शहरातील गंज वॉर्ड स्थित जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बारदान भरून असलेल्या दोन खोल्यांना आग लागल्याने बारदाना जळून खाक झाला. रविवारी (दि.२३) रात्री ९.३० वाजतादरम्यान ही घटना घडली असून या आगीमुळे बाजार समितीचे सुमारे ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्य ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. आता मात्र ते युवकांना पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. आता २०१९ मध्ये निवडणुका येत आहेत. ...
निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे वडसा-अर्जुनी-कोहमारा राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला होता. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून अखेर खड्डे ब ...
केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले. ...