शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने झाले १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:14 IST

२५ हजार शेतकरी बाधित : गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ८ ते १० सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी विभागांतर्गत पंचनामे करण्यात आले. त्यात १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, २५ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. हा नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविला जाणार असून, त्यानंतर नुकसानभरपाई जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात २ लाख १० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. धानाची रोवणी झाल्यानंतर पीक वाढण्याच्या स्थितीत असताना ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली होती. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका गोंदिया, आमगाव, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यांना बसला होता. 

नदी काठचे हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली होती. त्यामुळे धानासह भाजीपाला व इतर पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासन आणि प्रशासनाने कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेतली. त्यात अतिवृष्टीमुळे १० हजारवर हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले २५ हजारवर शेतकरी बाधित झाल्याचे पुढे आले. कृषी विभागातर्फे पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. 

शेतकऱ्यांच्या नजरा नुकसानभरपाईकडे अतिवृष्टीमुळे धानासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता कमी असल्याने चिंता सतावत आहे. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल सादर केल्यानंतर शासन नेमकी किती नुकसानभरपाई जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सहा तालुक्यांना बसला सर्वाधिक फटकागेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका हा गोंदिया, सालेकसा, आमगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी साचल्याने धानाची रोवणी वाहून गेली तर काही शेतकऱ्यांचे धान सडल्याने त्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शेतकरी व झालेले नुकसान तालुका                     बाधित शेतकरी                              बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये गोंदिया                            १३७१५                                           ६०३५ अर्जुनी मोरगाव                   ३९                                               ५.९० देवरी                               ११५१                                            ४६४. १६गोरेगाव                            ४३२                                              १४७. १६                 तिरोडा                             ४१९१                                            १८१. ८६आमगाव                           ३८७८                                          १२५९.५७ सडक अर्जुनी                    १११३                                             २४४.४८

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgondiya-acगोंदिया