शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

शासकीय रक्त केंद्रात आठवडाभर पुरेल एवढाच ‘स्टॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:29 AM

गोंदिया : आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो, यामुळेच रक्तदानाला ‘जीवदान’ म्हटले जाते. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे ...

गोंदिया : आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो, यामुळेच रक्तदानाला ‘जीवदान’ म्हटले जाते. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे रक्तदानाअभावी रक्त केंद्रातील रक्तसंकलन संकटात आले होते. परिणामी, रक्ताची गरज असलेल्या रुग्णाचा जीव वाचविणे अशक्य झाले होते. मात्र कोरोना व रक्तदानाचा काहीच संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली. असे असतानाच आता कोरोनाची लस तयार झाली असून अवघ्या देशात जोमात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक वाढत असल्याने लसीकरणावर जोर दिला जात आहे. विशेष म्हणजे, शासनाने ४५ वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून, त्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. येथे रक्तदान करणारे तरुण व युवकच मोठ्या संख्येत असल्याने लसीकरणामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही, असे निर्देश आहेत. परिणामी, रक्तदात्यांची संख्या घटत चालली आहे. याचा परिणाम रक्त केंद्रांवर होत आहे. शनिवारी (दि. ३) येथील शासकीय रक्त केंद्रात आठवडाभर पुरेल एवढाच साठा उपलब्ध होता. अशात रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची गरज असून तसे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांनी केले आहे.

--------------------------

आठवडाभराचाच साठा उपलब्ध

येथील शासकीय रक्तकेंद्रावरच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतून येणाऱ्या रुग्णांची दारोमदार आहे. मात्र लसीकरण वेग घेत असल्याने रक्तदात्यांची संख्या घटत चालली आहे. शनिवारी (दि. ३) येथील शासकीय रक्त केंद्रात ए-पॉझिटिव्ह ग्रुपच्या २८, ए-निगेटिव्ह ग्रुपची १, बी-पॉझिटिव्ह ग्रुपच्या ५०, बी-निगेटिव्ह ग्रुपच्या ३, ओ-पॉझिटिव्ह ग्रुपच्या ७५, ओ-निगेटव्ह ग्रुपच्या १, एबी-पॉझिटिव्ह ग्रुपच्या १२ तर एबी-निगेटिव्ह ग्रुपची १ रक्त पिशवी आहे. हा साठा येत्या आठवडाभर पुरेल एवढाच आहे.

-----------------------------

लोकमान्य ब्लड बँक

लसीकरण जोमात सुरू असून यामध्ये रक्तदान करणारा मुख्य गट येत असल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. आता २३ पिशव्याच शिल्लक असून, हा फक्त २ दिवसांचा साठा आहे. लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. अशात रक्तदात्यांनी रक्तदान करूनच लस घेण्याची गरज आहे.

--------------------------

लस घेण्यापूूर्वी करा रक्तदान

लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. यामुळे रक्तदात्यांची संख्या घटत असून रक्त केंद्रांतही रक्ताचा साठा कमी होत चालला आहे. अशात गरजूंना रक्त मिळाले नाही, तर त्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रक्तदान हे जीवदान असल्याने नागरिकांनी हा विचार करून लस घेण्यापूर्वी रक्तदान करून जीवदानाच्या या पवित्र कामात हातभार लावावा, असा संदेश नियमितपणे रक्तदान करणाऱ्या व गरजूंसाठी धावून जाणाऱ्या तरुण शुभम मधुकर निपाणे याने दिला आहे.

---------------------------