शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

सिंचन प्रकल्पात फक्त ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:54 IST

ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देमामा तलावांची स्थिती गंभीर : इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पातून पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.यामुळे येणारा काळ कठीणच म्हणावा लागणार असून आजपासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. यंदा जिल्ह्यात सप्टेंंबर महिन्यापर्यंत ८२ टक्के पाऊस झाला. चांगला पाऊस बरसला असे म्हटले जात असताना परतीच्या पावसाने दगा दिल्याने सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरली नाहीत. याचा प्रभाव धान पिकावरही पडला असून पावसाअभावी जिल्ह्यातील काही भागांत धान पिकाचे नुकसानही झाल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पांतून पाणी सोडले जात आहे. परिणामी इटियाडोह प्रकल्पात आता ४१ टक्के व सिरपूर प्रकल्पात फक्त २७ टक्के पाणीासाठा आहे.मागील वर्षी जिल्ह्यात फक्त ५८ टक्के पाऊस पडला होता. परिणामी जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ दिसून आली होती. आता यंदाची पाणीसाठयाची आकडेवारी बघून शासनाची चिंता वाढली असल्याचे दिसते. यामुळेच राज्य शासनाने जिल्ह्यातील देवरी, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले आहे. पाटबंधारे विभागानुसार, मध्यम प्रकल्पातील ९ प्रकल्पांत २८.५९ टक्के, लघु प्रकल्पांतर्गत २२ प्रकल्पांत ३३.०७ तर ३८ मालगुजारी तलावांत ३९.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.चिरचारबांध तलाव आटलापाणीसाठा घटत चालला असतानाच आमगाव तालुक्यातील चिरचाडबांध तलाव मात्र आताच कोरडे पडले असून तलावात पाणीसाठाच नाही. मामा तलावांतर्गत कोसबीबकी तलावात १.३५ टक्के, ककोडी ९.१८ टक्के, तेढा ३.३२ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा प्रकल्पात ८.१६ टक्के तर लघु प्रकल्पांतर्गत भदभद्या प्रकल्पात ६.२६ टक्के, गुमडोह ४.२२, रिसाळा ३.८२, सोनेगाव ८.२३, सडेपार ७.०६, सेरपार ५.७० टक्के पाणीसाठा आहे. या तलावांची स्थिती बघता येत्या डिसेंबर महिन्यापूर्वीच हे तलाव कोरडे पडू शकतात असे दिसून येत आहे. याशिवाय, बोदलकसा तलावात १७.९१ टक्के, चूलबंद १९.३३, खैरबंदा २१.७९, रेंगेपार २३.५९, आक्टीटोला १६.५३, पांगडी २५.८५, रेहाडी १०.२५, राजोली १३.०१, कोकणा १९.४८, खाडीपार २१.७०, नांदलपार १७, भानपूर १०.६६ तर बोपाबोडी तलावात १५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई