शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पात फक्त ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:54 IST

ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देमामा तलावांची स्थिती गंभीर : इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पातून पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे.यामुळे येणारा काळ कठीणच म्हणावा लागणार असून आजपासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. यंदा जिल्ह्यात सप्टेंंबर महिन्यापर्यंत ८२ टक्के पाऊस झाला. चांगला पाऊस बरसला असे म्हटले जात असताना परतीच्या पावसाने दगा दिल्याने सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरली नाहीत. याचा प्रभाव धान पिकावरही पडला असून पावसाअभावी जिल्ह्यातील काही भागांत धान पिकाचे नुकसानही झाल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इटियाडोह, पुजारीटोला व सिरपूर प्रकल्पांतून पाणी सोडले जात आहे. परिणामी इटियाडोह प्रकल्पात आता ४१ टक्के व सिरपूर प्रकल्पात फक्त २७ टक्के पाणीासाठा आहे.मागील वर्षी जिल्ह्यात फक्त ५८ टक्के पाऊस पडला होता. परिणामी जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ दिसून आली होती. आता यंदाची पाणीसाठयाची आकडेवारी बघून शासनाची चिंता वाढली असल्याचे दिसते. यामुळेच राज्य शासनाने जिल्ह्यातील देवरी, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले आहे. पाटबंधारे विभागानुसार, मध्यम प्रकल्पातील ९ प्रकल्पांत २८.५९ टक्के, लघु प्रकल्पांतर्गत २२ प्रकल्पांत ३३.०७ तर ३८ मालगुजारी तलावांत ३९.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.चिरचारबांध तलाव आटलापाणीसाठा घटत चालला असतानाच आमगाव तालुक्यातील चिरचाडबांध तलाव मात्र आताच कोरडे पडले असून तलावात पाणीसाठाच नाही. मामा तलावांतर्गत कोसबीबकी तलावात १.३५ टक्के, ककोडी ९.१८ टक्के, तेढा ३.३२ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा प्रकल्पात ८.१६ टक्के तर लघु प्रकल्पांतर्गत भदभद्या प्रकल्पात ६.२६ टक्के, गुमडोह ४.२२, रिसाळा ३.८२, सोनेगाव ८.२३, सडेपार ७.०६, सेरपार ५.७० टक्के पाणीसाठा आहे. या तलावांची स्थिती बघता येत्या डिसेंबर महिन्यापूर्वीच हे तलाव कोरडे पडू शकतात असे दिसून येत आहे. याशिवाय, बोदलकसा तलावात १७.९१ टक्के, चूलबंद १९.३३, खैरबंदा २१.७९, रेंगेपार २३.५९, आक्टीटोला १६.५३, पांगडी २५.८५, रेहाडी १०.२५, राजोली १३.०१, कोकणा १९.४८, खाडीपार २१.७०, नांदलपार १७, भानपूर १०.६६ तर बोपाबोडी तलावात १५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई