शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ओबीसींनी संवैधानिक अधिकारासाठी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:00 PM

पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील.

ठळक मुद्देनाना पटोले । कुणबी समाजाचे अधिवेशन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सन १९३१ नंतर जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसींची लोकसंख्या किती आहे हे कळायला मार्ग नाही. प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे माहिती करुन घेण्याकरिता जातीनिहाय जनगणना होणे महत्वाचे असून बहुजनांनी जातीनिहाय जनगणनेचे कॉलम असेल तर जनगणनेला सहकार्य करा अन्यथा बहिष्कार करा. ओबीसींनी आपसातील मदभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संवैधानिक अधिकार मिळू शकतील असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ समाजसेवक काशीराम शिवणकर होते. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, विजय बहेकार, अमर वऱ्हाडे, नामदेव किरसान, नटवरलाल गांधी, सरपंच कल्पना बहेकार, प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, रमेश चुटे, सभापती दिलीप वाघमारे, डॉ. संजय देशमुख, राजू काळे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, कमल बहेकार, युगराम कोरे, भूमेश्वर मेंढे, इंदू कोरे, अजया चुटे, वंदना काळे, माजी सरपंच रेखा फुंडे, डॉ. अजय उमाटे, संतोष अग्रवाल, संतोष बोहरे, संजय दोनोडे, शमलाल दोनोडे, डॉ. वाळके, देवराम खोटेले, उपसरपंच फुंडे, पुरुषोत्तम कोरे, टी.जी.फुंडे, प्रा. दखणे, प्रा. काटेखाये, प्रा. भदाडे, एस.के. कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबा, सुभाषचंद्र बोस यांच्या छायाचित्रांना पूजन करून झाली.पुढे बोलताना पटोले यांनी, पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील. लोकशाहीत जनतेची भूमिका महत्वपूर्ण असते. विधानसभा अध्यक्षाच्या रुपाने लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी राजदंड वापरण्याची ताकद आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला खºया अर्थाने न्याय देण्याची माझी भूमिका राहील, असेही त्यांनी सांगीतले.समितीकडून जाहीर सत्कारयाप्रसंगी समितीच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नाना पटोले यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच साखरीटोला येथील विविध संघटना, संस्था व शाळा-कॉलेजच्यावतीने भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या कुणबी समाजातील तरुणांचा पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेOBC Reservationओबीसी आरक्षण