शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 5:00 AM

हावडा-मुंबई मार्गावर मागील तीन चार वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली; पण जिल्ह्यातील चार-पाच रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाड्यांना अजूनही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला; पण त्याची अजूनही दखल घेण्यात आली नसल्यामुळे समस्या कायम आहे. 

ठळक मुद्देविशेष गाड्यांमुळे समस्या; दररोज धावतात ४७ गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वेस्थानक असून, लॉकडाऊनपूर्वी या मार्गावरून दरराेज ९० गाड्या धावत हाेत्या, तर सद्यस्थितीत दररोज ४७ गाड्या धावत आहेत. यात विशेष गाड्यांची संख्या अधिक असून, या गाड्या तिरोडा, आमगाव, सौंदड, सालेकसा, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांना ३० ते ४० किमीचे अंतर गाठून रेल्वे पकडावी लागत आहे. हावडा-मुंबई मार्गावर मागील तीन चार वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली; पण जिल्ह्यातील चार-पाच रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाड्यांना अजूनही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला; पण त्याची अजूनही दखल घेण्यात आली नसल्यामुळे समस्या कायम आहे. या ठिकाणी रेल्वे थांबे कधी मिळणार- गोंदिया जिल्ह्यातून हावडा-मुंबई आणि गोंदिया-चांदाफोर्ट हे दोन मार्ग गेले आहे. या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या बरीच आहे. मात्र अजूनही बऱ्याच एक्स्प्रेस गाड्यांना तिरोडा, आमगाव, सालेकसा, सौंदड, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकावर अद्यापही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम आहे. - या रेल्वे स्थानकावर विशेष गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना २० ते ३० किमीचा फेरा मारुन रेल्वेचा प्रवास करावा लागतो. 

विशेष गाड्यांनाच थांबा नाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या काही मार्गावर विशेष रेल्वे गाड्याच धावत आहेत. या विशेष गाड्या असल्याने त्यांना काही रेल्वे स्थानकांवर थांबा नाही. नियमित गाड्या सुरू झाल्यानंतर थांबे वाढविण्यात येतील.- जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास मी गोंदियाहून तिरोड्याला दररोज अपडाऊन करतो. मात्र गोंडवाना, आझाद हिंद, समता एक्स्प्रेस यासारख्या महत्त्वपूर्ण गाड्यांना थांबा नसल्याने आमची फार गैससोय होत असून, एसटीने प्रवास करावा लागत आहे. - मनोज दमाहे, प्रवासी

गोंदियाहून मी अर्जुनी मोरगाव रेल्वे गाडीने प्रवास करीत होतो. मात्र कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे गाड्या बंद आहेत. तर काही विशेष गाड्या मार्गावरून जात असून, त्यांना थांबे नसल्याने अडचण होत आहे. - मनीष गावंडे, प्रवासी 

टॅग्स :railwayरेल्वे