शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

आता २०० लोकांच्या उपस्थितीत हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

लग्न समारंभासाठी २०० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे. विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील २०० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे, तेथे अर्जासोबत वधू-वराचे आधार कार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे आता त्यापूर्वी आटोपून घेण्यासाठी वर-वधू पित्यांची धावपळ सुरू झाली आहे. शासनाने विवाह सोहळ्यांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लग्नाची कामे सोडून वर-वधू पित्यांना परवानगीसाठी शासकीय कार्यालयात ये-जा करावी लागत आहे. लग्न समारंभासाठी २०० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे. विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील २०० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे, तेथे अर्जासोबत वधू-वराचे आधार कार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते. 

लग्न समारंभासाठी या आहेत अटीमंगल कार्यालय : खुल्या प्रांगणातील  लॉन किंवा बंदिस्त कार्यालयातील विवाह सोहळे प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड  प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल अशी अट घालून दिली आहे.लाॅन: खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यात प्रांगण किंवा लॉनमध्ये ५० टक्के,  परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती लग्न समारंभात उपस्थित राहू शकतील. बंदिस्त कार्यालय, हॉटेलात उपस्थिती संख्या ५० टक्के असणार आहे. विशेष म्हणजे, सभागृहाचे सॅनिटायझेशन व मास्कचा वापर अनिवार्य आहे.

मंगल कार्यालय चालकांत उत्साहमंगल कार्यालयात २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने आता आमचा बंद असलेला रोजगार सुरू होणार अशी आशा आहे. लोकांचे लग्न समारंभ आटोपले असले तरी आता एक- दोन लग्न समारंभ आपल्या मंगल कार्यालयातून होणार आहेत.- पुष्पकांत बहेकार, मंगल कार्यालय चालक

ऐन लग्नाच्या मोसममध्ये कोरोनाचा कहर होता. त्यामुळे मंगल कार्यालय बंदचे आदेश दिले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जिल्हा प्रशासनाने मंगल कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिलेत. परंतु, पावसाळ्यात लग्न समारंभ अत्यंत कमी आहेत.- कैलाश शेंडे, मंगल कार्यालय चालक

लग्नाच्या तारखा यंदा लग्नाच्या तारखा नसल्याने तुळशी विवाहापर्यंत लग्न समारंभासाठी वाट पाहावी लागणार आहे.आज समाज कितीही मॉडर्न झाला असला तरीही प्रत्येकच धर्म व जातीत विवाह सोहळ्यात पारंपरिक काही नियमांचे पालन केले जातेच. यात विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त बघितलाच जातो. हिंदू धर्मात पंडितांकडून शुभ दिवस व वेळ बघूनच विवाह ठरविले जातात. जोडप्याच्या भावी सुखी संसारासाठी आजही प्रत्येकच घरात विवाहाचा शुभ मुहूर्त बघितला जातोच. देवशयनी एकादशी नंतर देवता शयन करतात असे म्हटले जाते व त्यामुळेच या काळात शुभ कार्य केले जात नाही. तुळशी विवाहनंतरच आता शुभ कार्यांना सुरूवात केली जाईल.केे -पंडित गोविंद शर्मा

रोजी सुरू झाल्याने बॅंडवालेही जोरातलग्न समारंभ सुरू झाल्याने आता आमची रोजीरोटी सुरू झाली. परंतु, पावसाळा असल्याने लग्न समारंभ अत्यंत कमी आहेत. लग्नाच्या तारखा नसल्याने प्रशासनाने मुभा देऊनही आम्ही रिकामेच आहोत.- आशिष तलमले, बॅंड चालकजेव्हा लग्न समारंभ होते, तेव्हा आम्हाला परवानगी नव्हती. आता लग्नाच्या तारखाच नसताना जिल्हा प्रशासनाने लग्नाची मुभा दिली आहे, अशा वेळेस आम्हाला रोजगाराचा शोध असतानाही लग्नच नाहीत तर काम कसे करणार.- अंकेश गणवीर, बॅंड चालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न