२८० बालकांना नवजीवन

By Admin | Updated: December 11, 2014 23:08 IST2014-12-11T23:08:19+5:302014-12-11T23:08:19+5:30

सिकलसेलच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असणाऱ्या बाई गंगाबाई

Novelize 280 babies | २८० बालकांना नवजीवन

२८० बालकांना नवजीवन

सिकलसेलग्रस्तांना दिलासा : रक्त संकलनात गोंदिया आघाडीवर
गोंदिया : सिकलसेलच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असणाऱ्या बाई गंगाबाई रुग्णालयावर नेहमीच रक्तपुरवठ्याचा ताण पडतो. मात्र त्या ताणावर मात करीत या रक्तपेढीने पूर्व विदर्भात सर्वाधिक रक्तसंकलन करीत सिकलसेलने ग्रस्त असणाऱ्या २८० बालकांना नवजीवन दिले आहे.
बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतर्फे आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात प्रभावीपणे ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम राबविली. त्यामुळे संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्ह्याने मासिक १२०० युनिट रक्त संकलन करून रेकॉर्ड ब्रेक करीत इतर जिल्ह्यांना मागे टाकले आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेत प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिंदे यांनी स्वत: रक्तदान करुन जि.प. मधील सर्व कर्मचाऱ्यांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. त्यात १०१ युनिट रक्त बाई गंगाबाई रक्तपेढीला मिळाले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बालक दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी गोंदिया पंचायत समितीत गटविकास अधिकारी वालकर व भांडारकर यांच्या नेतृत्वात घेतलेल्या शिबिरातही १०० रक्त युनिट संकलित करण्यात आले.
धापेवाडा, सडक/अर्जुनी, सौंदड येथेही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ या कालावधीत जिथे चंद्रपूर जिल्ह्यात ६३०, गडचिरोली-६१०, भंडारा-९०० व वर्धा-२१६ याप्रमाणे युनिट रक्त संकलित झाले तिथे बाई गंगाबाई रक्तपेढीत महिनाभरात १२०० युनिट रक्त संकलित झाले. गोंदिया जिल्ह्यातील या रेकॉर्ड ब्रेक ऐच्छिक रक्त संकलनाबद्दल उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी विभागीय बैठकीमध्ये रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्या विशेष प्रयत्नांसाठी त्यांचे कौतुक केले.
ऐच्छिक रक्त संकलनातून गोळा झालेल्या या रक्तसाठ्यातून गोंदिया जिल्ह्यातील २८० सिकलसेल बालरुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यात मयुर कोटांगले, सकिना जुडो, दीक्षा बसाने, प्राज्वल राघोर्ते, समीक्षा सहारे, असित मडावी, दीक्षा कोठेवार, सावनी भोतमांगे,बनकर, लक्ष्मी मस्के, तरुण चित्रीव, प्रियंका डोंगरे, रुपाली ठाकरे, फैय्याज शेख, पारस नंदेश्वर, आदित्य लिल्हारे, कुणाल वाघाडे, माला मेश्राम, मयुर नंदेश्वर, सौरभ दमाहे, रौनक रामटेके, विवेक जांभुळकर, उमेश मेश्राम, हेमलता बोरकर, राजा राऊत, पंकज वालदे, समीक्षा सहारे, सिंधु उके, संदीप शेंडे, प्रणय बोरकर, रितीक शेंडे, स्वाती सावणकर, सायली वाहणे, श्रेया टेंभुर्णे, रिषभ टेंभुर्णे, निकीता जांभुळकर, मंदा गजभिये, चेतन सोनावणे, रणजीत डोंगरे यांच्यासह इतर अशा एकूण २८० बालकांचा समावेश आहे. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील डे केअर सेंटरमध्ये व शहरातील विविध बालरोग तज्ज्ञांकडे मोफत रक्तपुरवठा केल्याने त्या बालरुग्णांना नवजीवन मिळू शकले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Novelize 280 babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.