शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; अवकाळी पावसामुळे लागला हातभार

By कपिल केकत | Updated: May 20, 2023 16:16 IST

अवकाळी पावसामुळे लागला हातभार

गोंदिया : यंदा ऊन चांगले तापत असून त्यात पाऊसही लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो; मात्र वैनगंगा नदीला पुरेपूर पाणी असून १५ जूनपर्यंत तर शहराला पाणीपुरवठा करता येणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली आहे. यामुळे तोपर्यंत तरी टेन्शन नाही... कारण, वैनगंगा नदी तहान भागविणार आहे.

शहराला तालुक्यातील ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामुळेच वैनगंगेवरच शहरवासीयांची तहान अवलंबून आहे. एरवी वैनगंगा नदी पाण्याने भरून असते; मात्र उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात वैनगंगेतील पाण्याची पातळी म्हटल्यास एकदम धडकी भरते अशीच स्थिती असते. त्यातही आता उन्हाळा आपल्या रंगात आला असून ‘मे हीट’ चांगलाच भाजून काढत आहे. अशात पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम पडतो.

विशेष म्हणजे, मध्यंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळांना पाणीपुरवठा होत नसल्याने वैनगंगेतील पाण्याची पातळी कमी तर झाली नाही अशी धडकीही नागरिकांना भरली होती. त्यात हवामान खात्याने यंदा पाऊस लांबला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशात वैनगंगा नदीला पाणी असणे गरजेचे आहे. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवणार यात शंका नाही; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, वैनगंगेत आताही पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणी पुरणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता नितीन तंगडपल्लीवार यांनी दिली. यामुळे शहरवासीयांना घाबरण्याचे कारण नसून वैनगंगा शहरवासीयांची तहान यंदाही उन्हाळ्यात भागविणार आहे.

पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही

सन २०१८ व २०१९ मध्ये वैनगंगा नदी आटली होती व परिणामी गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. त्या काळाची आठवण करताच आताही तोंडचे पाणी पळून जाते अशी स्थिती आहे; मात्र सुदैवाने यंदा सध्या तरी वैनगंगेला पुरेपूर पाणीसाठा असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली. यामुळे यंदाही पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही अशी सध्या तरी शक्यता वर्तविली जात आहे.

नव्याने बंधारा बांधणार

वैनगंगा नदीतील पाणी वाहून जाऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वेळीच खबरदारी घेत नदीवर रेती पोतींपासून बंधारा बांधण्यात आला होता; मात्र बरसलेल्या अवकाळी पावसामुळे नदीला चांगले पाणी आले व तो बंधारा वाहून गेला. यामुळे नदीतील पाणी अडवून ठेवण्यासाठी परत बंधारा बांधला जाणार आहे. जेणेकरून नदीत पाणीसाठा रहावा व शहराच्या पाणीपुरवठ्याची सोय व्हावी. यात एक बाब चांगली झाली की, अवकाळी पावसामुळे हातभार लागला असून नदीला पाणी आले व आता तेच पाणी शहराला पुरवठा करण्याच्या कामी येत आहे.

वैनगंगा नदीला सध्या पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणीपुरवठा करता येणार असा अंदाज आहे; मात्र तरीही शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपूनच करावा. पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे.- नितीन तंगडपल्लीवार, उपविभागीय अभियंता, मजिप्रा.

टॅग्स :riverनदीRainपाऊसWaterपाणी