शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; अवकाळी पावसामुळे लागला हातभार

By कपिल केकत | Updated: May 20, 2023 16:16 IST

अवकाळी पावसामुळे लागला हातभार

गोंदिया : यंदा ऊन चांगले तापत असून त्यात पाऊसही लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो; मात्र वैनगंगा नदीला पुरेपूर पाणी असून १५ जूनपर्यंत तर शहराला पाणीपुरवठा करता येणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली आहे. यामुळे तोपर्यंत तरी टेन्शन नाही... कारण, वैनगंगा नदी तहान भागविणार आहे.

शहराला तालुक्यातील ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामुळेच वैनगंगेवरच शहरवासीयांची तहान अवलंबून आहे. एरवी वैनगंगा नदी पाण्याने भरून असते; मात्र उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात वैनगंगेतील पाण्याची पातळी म्हटल्यास एकदम धडकी भरते अशीच स्थिती असते. त्यातही आता उन्हाळा आपल्या रंगात आला असून ‘मे हीट’ चांगलाच भाजून काढत आहे. अशात पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम पडतो.

विशेष म्हणजे, मध्यंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळांना पाणीपुरवठा होत नसल्याने वैनगंगेतील पाण्याची पातळी कमी तर झाली नाही अशी धडकीही नागरिकांना भरली होती. त्यात हवामान खात्याने यंदा पाऊस लांबला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशात वैनगंगा नदीला पाणी असणे गरजेचे आहे. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवणार यात शंका नाही; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, वैनगंगेत आताही पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणी पुरणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता नितीन तंगडपल्लीवार यांनी दिली. यामुळे शहरवासीयांना घाबरण्याचे कारण नसून वैनगंगा शहरवासीयांची तहान यंदाही उन्हाळ्यात भागविणार आहे.

पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही

सन २०१८ व २०१९ मध्ये वैनगंगा नदी आटली होती व परिणामी गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. त्या काळाची आठवण करताच आताही तोंडचे पाणी पळून जाते अशी स्थिती आहे; मात्र सुदैवाने यंदा सध्या तरी वैनगंगेला पुरेपूर पाणीसाठा असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली. यामुळे यंदाही पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही अशी सध्या तरी शक्यता वर्तविली जात आहे.

नव्याने बंधारा बांधणार

वैनगंगा नदीतील पाणी वाहून जाऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वेळीच खबरदारी घेत नदीवर रेती पोतींपासून बंधारा बांधण्यात आला होता; मात्र बरसलेल्या अवकाळी पावसामुळे नदीला चांगले पाणी आले व तो बंधारा वाहून गेला. यामुळे नदीतील पाणी अडवून ठेवण्यासाठी परत बंधारा बांधला जाणार आहे. जेणेकरून नदीत पाणीसाठा रहावा व शहराच्या पाणीपुरवठ्याची सोय व्हावी. यात एक बाब चांगली झाली की, अवकाळी पावसामुळे हातभार लागला असून नदीला पाणी आले व आता तेच पाणी शहराला पुरवठा करण्याच्या कामी येत आहे.

वैनगंगा नदीला सध्या पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणीपुरवठा करता येणार असा अंदाज आहे; मात्र तरीही शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपूनच करावा. पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे.- नितीन तंगडपल्लीवार, उपविभागीय अभियंता, मजिप्रा.

टॅग्स :riverनदीRainपाऊसWaterपाणी