शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; अवकाळी पावसामुळे लागला हातभार

By कपिल केकत | Updated: May 20, 2023 16:16 IST

अवकाळी पावसामुळे लागला हातभार

गोंदिया : यंदा ऊन चांगले तापत असून त्यात पाऊसही लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो; मात्र वैनगंगा नदीला पुरेपूर पाणी असून १५ जूनपर्यंत तर शहराला पाणीपुरवठा करता येणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली आहे. यामुळे तोपर्यंत तरी टेन्शन नाही... कारण, वैनगंगा नदी तहान भागविणार आहे.

शहराला तालुक्यातील ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामुळेच वैनगंगेवरच शहरवासीयांची तहान अवलंबून आहे. एरवी वैनगंगा नदी पाण्याने भरून असते; मात्र उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात वैनगंगेतील पाण्याची पातळी म्हटल्यास एकदम धडकी भरते अशीच स्थिती असते. त्यातही आता उन्हाळा आपल्या रंगात आला असून ‘मे हीट’ चांगलाच भाजून काढत आहे. अशात पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम पडतो.

विशेष म्हणजे, मध्यंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळांना पाणीपुरवठा होत नसल्याने वैनगंगेतील पाण्याची पातळी कमी तर झाली नाही अशी धडकीही नागरिकांना भरली होती. त्यात हवामान खात्याने यंदा पाऊस लांबला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशात वैनगंगा नदीला पाणी असणे गरजेचे आहे. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवणार यात शंका नाही; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, वैनगंगेत आताही पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणी पुरणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता नितीन तंगडपल्लीवार यांनी दिली. यामुळे शहरवासीयांना घाबरण्याचे कारण नसून वैनगंगा शहरवासीयांची तहान यंदाही उन्हाळ्यात भागविणार आहे.

पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही

सन २०१८ व २०१९ मध्ये वैनगंगा नदी आटली होती व परिणामी गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. त्या काळाची आठवण करताच आताही तोंडचे पाणी पळून जाते अशी स्थिती आहे; मात्र सुदैवाने यंदा सध्या तरी वैनगंगेला पुरेपूर पाणीसाठा असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली. यामुळे यंदाही पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही अशी सध्या तरी शक्यता वर्तविली जात आहे.

नव्याने बंधारा बांधणार

वैनगंगा नदीतील पाणी वाहून जाऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वेळीच खबरदारी घेत नदीवर रेती पोतींपासून बंधारा बांधण्यात आला होता; मात्र बरसलेल्या अवकाळी पावसामुळे नदीला चांगले पाणी आले व तो बंधारा वाहून गेला. यामुळे नदीतील पाणी अडवून ठेवण्यासाठी परत बंधारा बांधला जाणार आहे. जेणेकरून नदीत पाणीसाठा रहावा व शहराच्या पाणीपुरवठ्याची सोय व्हावी. यात एक बाब चांगली झाली की, अवकाळी पावसामुळे हातभार लागला असून नदीला पाणी आले व आता तेच पाणी शहराला पुरवठा करण्याच्या कामी येत आहे.

वैनगंगा नदीला सध्या पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणीपुरवठा करता येणार असा अंदाज आहे; मात्र तरीही शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपूनच करावा. पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे.- नितीन तंगडपल्लीवार, उपविभागीय अभियंता, मजिप्रा.

टॅग्स :riverनदीRainपाऊसWaterपाणी