शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मानाकुही तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:08 IST

तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून पाण्याची गळती : मनसेने दिले तलाव दुरुस्तीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. यावर मनसेच्यावतीने समाधान योजना व जनजागरण शिबिरात मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.मानाकुही तलावातील मुख्य वितरिकेतून सतत २ वर्षांपासून पाणी वाहतजात असल्याने संपूर्ण धरण रिकामे होऊन शेतकरी व वन्य प्राण्यांची उन्हाळयात गैरसोय होते. वन्यजीव पाण्याच्या शोधात गावाकडे येऊन गावकºयांना त्रास होऊन शेतीचे नुकसान सुद्धा होत आहे. एकीकडे जलसंधारणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कोट्यवधी रु पये खर्च केले जात आहेत. त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्यय होत आहे. पाटबंधारे उपविभागातर्फे पाठविण्यात आलेल्या एका पत्रानुसार पैशांचा तुटवडा असल्याने संबंधित कार्य करता येत नाही असे कारण पुढे करण्यात आले होते.तसेच महाराष्ट्र राज्य सचिवालयांच्या पत्रानुसार नागपूर विभागाला लागणाऱ्या रक्कमेची पूर्तता करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीचे आदेश सुद्धा देण्यात आले होते. परंतु ८ महिने लोटून गेले तरीही संबंधित विभागाचे मानाकुही तलावाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मनसेने पाण्यासाठी दंड थोपटले असून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशाला प्रशासनाला दिला आहे. विशेष म्हणजे, सदर तलावाची क्षमता ८५६.३० टीएमसी एवढी असून मागील २ वर्षांपासून पाण्याची गळती सुरु आहे. सालेकसा तालुक्यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सक्रीय असून कोणत्याही पक्षातर्फे किंवा सामाजिक संस्थांतर्फे पाण्यासाठी आंदोलन केलेले नाही.अशात मनसेतर्फे समाधान शिबिरात आमदार संजय पुराम, उपजिल्हाधिकारी अशोक लटरे, नायब तहसीलदार भुरे ह्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमगाव तालुक्याचे तहसीलदार साहेबराव राठोड, नगराध्यक्ष वीरेंद्र उईके, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे उपस्थित होते. निवेदन देताना तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुका उपाध्यक्ष ध्रुवकुमार हुकरे, दिलीप ढेकवार, शहर अध्यक्ष राहुल हटवार, विध्यार्थी सेनेचे गोल्डी भाटिया, स्वप्नील करवाडे, स्वप्नील बोंबार्डे, अश्विन गोस्वामी आणि समस्त मनसैनिक उपस्थित होते.आमरण उपोषणाचा इशारामनसेच्यावतीने जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावर संबंधीत विभागाने कार्यवाही केली नाही तर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्याची नासाडी करणे हा देशद्रोह असून विभाग व संबंधित अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालविणार आहे. तसेच तालुकाध्यक्ष बैस आणि शहर अध्यक्ष हटवार आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती बैस यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई