शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

मानाकुही तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:08 IST

तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून पाण्याची गळती : मनसेने दिले तलाव दुरुस्तीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. यावर मनसेच्यावतीने समाधान योजना व जनजागरण शिबिरात मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.मानाकुही तलावातील मुख्य वितरिकेतून सतत २ वर्षांपासून पाणी वाहतजात असल्याने संपूर्ण धरण रिकामे होऊन शेतकरी व वन्य प्राण्यांची उन्हाळयात गैरसोय होते. वन्यजीव पाण्याच्या शोधात गावाकडे येऊन गावकºयांना त्रास होऊन शेतीचे नुकसान सुद्धा होत आहे. एकीकडे जलसंधारणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कोट्यवधी रु पये खर्च केले जात आहेत. त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्यय होत आहे. पाटबंधारे उपविभागातर्फे पाठविण्यात आलेल्या एका पत्रानुसार पैशांचा तुटवडा असल्याने संबंधित कार्य करता येत नाही असे कारण पुढे करण्यात आले होते.तसेच महाराष्ट्र राज्य सचिवालयांच्या पत्रानुसार नागपूर विभागाला लागणाऱ्या रक्कमेची पूर्तता करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीचे आदेश सुद्धा देण्यात आले होते. परंतु ८ महिने लोटून गेले तरीही संबंधित विभागाचे मानाकुही तलावाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मनसेने पाण्यासाठी दंड थोपटले असून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशाला प्रशासनाला दिला आहे. विशेष म्हणजे, सदर तलावाची क्षमता ८५६.३० टीएमसी एवढी असून मागील २ वर्षांपासून पाण्याची गळती सुरु आहे. सालेकसा तालुक्यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सक्रीय असून कोणत्याही पक्षातर्फे किंवा सामाजिक संस्थांतर्फे पाण्यासाठी आंदोलन केलेले नाही.अशात मनसेतर्फे समाधान शिबिरात आमदार संजय पुराम, उपजिल्हाधिकारी अशोक लटरे, नायब तहसीलदार भुरे ह्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमगाव तालुक्याचे तहसीलदार साहेबराव राठोड, नगराध्यक्ष वीरेंद्र उईके, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे उपस्थित होते. निवेदन देताना तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुका उपाध्यक्ष ध्रुवकुमार हुकरे, दिलीप ढेकवार, शहर अध्यक्ष राहुल हटवार, विध्यार्थी सेनेचे गोल्डी भाटिया, स्वप्नील करवाडे, स्वप्नील बोंबार्डे, अश्विन गोस्वामी आणि समस्त मनसैनिक उपस्थित होते.आमरण उपोषणाचा इशारामनसेच्यावतीने जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावर संबंधीत विभागाने कार्यवाही केली नाही तर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्याची नासाडी करणे हा देशद्रोह असून विभाग व संबंधित अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालविणार आहे. तसेच तालुकाध्यक्ष बैस आणि शहर अध्यक्ष हटवार आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती बैस यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई