शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विषमुक्त नैसर्गिक शेती काळाची गरज

By admin | Updated: April 18, 2016 04:12 IST

विषमुक्त नैसर्गिक शेती करून शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक

सालेकसा : विषमुक्त नैसर्गिक शेती करून शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती करुन भूमातेला वाचवित स्वत:चे जीवन नष्ट होण्यापासून वाचवू शकतो, असे प्रतिपादन नागपूरचे कृषितज्ज्ञ व मार्गदर्शक डॉ. हेमंत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते साकरीटोला येथे झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करीत होते. शेतकरी संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. रामरतन राऊत यांच्या हस्ते, कामठा येथील प्रगतिशील शेतकरी धनीराम भाजीपाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे कृषी विषयतज्ज्ञ हेमंत चव्हाण, चाचेर येथील प्रगतीशील शेतकरी विरेंद्र बरबटे, माजी पं.स. सभापती तुकाराम बोहरे व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश बोहरे यांनी मांडले व नैसर्गिक शेतीच्या प्रशिक्षणाची गरज व महत्व सांगितले. हेमंत चव्हाण आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, आज आपल्याला आमच्या तिन्ही मातेच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यात भूमाता, गोमाता आणि जन्मदात्रीचे संरक्षण करण्यासाठी जो कोणी सतत प्रयत्नशील राहील, त्याला जीवनात कधीच अपयश येणार नाही. परंतु दुर्दैवाने आजच्या परिस्थितीत व्यक्ती आपल्या या तिन्ही मातांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्याला तसे परिणामही भोगावे लागत आहे. विविध प्रकारचे कष्ट व वेदना सहन करीत आई आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून अथक प्रयत्न करते. तोच मुलगा पुढे जाऊन आपल्या आईला वाडीत टाकून निघून जातो व मागे वळून पाहत नाही. आईच्या दुधाला विसरुन व गाईच्या दुधाकडे दुर्लक्ष करुन बाजारातील नकली दुधाचा उपयोग करतो. त्यामुळे त्याची मानसिक वृत्ती विकृत झालेली असते. गोमातेबद्दल आजचा शेतकरीसुद्धा निर्दयी झालेला दिसतो व ती वृद्ध झाल्यावर कसायला विकून टाकतो. एका शेतकऱ्याने एका देशी गायची सेवा केली तर त्याला उत्तम प्रकारे नैसर्गिक शेती करण्यासाठी फार उपयोगी व महत्वाची ठरेल. रासायनिक खताचा वापर टाळून गोमूत्र आणि शेनापासून तयार झालेले खत शेतीत वापरले तर उत्तम व दर्जेदार पीक येईल व गाईच्या दुधाचे सेवन करणाऱ्याला आईचेसुद्धा महत्व कळेल. तसेच भूमातेलासुद्धा वाचविता येईल. त्यांनी पदमश्री डॉ. सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र कोणकोणते याबद्दल सविस्तर सांगितले. रामरतन राऊत यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील शेतजमीन व तिचे उर्वरकतेबद्दल व गुण वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. चाचेरचे विरेंद्र बरबडे यांनी जमिनीची पोत टिकवून ठेवण्यासाठी धानाच्या शेतीबरोबरच बागायती फळाच्या शेतीचे महत्व सादर केले. याप्रसंगी काही स्थानिक शेतकऱ्यांनीसुद्धा आपले बरे-वाईट अनुभव कथन केले. कार्यक्रमात महिला शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. संचालन रघुनाथ चुटे यांनी केले. आभार सेवक बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेश बोहरे, डॉ. रामेश्वर दोनोडे, चंद्रभान मुनेश्वर, सुनील फुंडे, पप्पू पठाण, राजकुमार थेर, तारकेश्वर ब्राम्हणकर, चंद्रकांत गजभिये, नामदेव दोनोडे, मुकेश रामटेके, परिम कोरे, मोहन दोनोडे, राजू भांडारकर, मुकेश फुंडे, चुटे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)