शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

विषमुक्त नैसर्गिक शेती काळाची गरज

By admin | Updated: April 18, 2016 04:12 IST

विषमुक्त नैसर्गिक शेती करून शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक

सालेकसा : विषमुक्त नैसर्गिक शेती करून शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती करुन भूमातेला वाचवित स्वत:चे जीवन नष्ट होण्यापासून वाचवू शकतो, असे प्रतिपादन नागपूरचे कृषितज्ज्ञ व मार्गदर्शक डॉ. हेमंत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते साकरीटोला येथे झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करीत होते. शेतकरी संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. रामरतन राऊत यांच्या हस्ते, कामठा येथील प्रगतिशील शेतकरी धनीराम भाजीपाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे कृषी विषयतज्ज्ञ हेमंत चव्हाण, चाचेर येथील प्रगतीशील शेतकरी विरेंद्र बरबटे, माजी पं.स. सभापती तुकाराम बोहरे व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश बोहरे यांनी मांडले व नैसर्गिक शेतीच्या प्रशिक्षणाची गरज व महत्व सांगितले. हेमंत चव्हाण आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, आज आपल्याला आमच्या तिन्ही मातेच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यात भूमाता, गोमाता आणि जन्मदात्रीचे संरक्षण करण्यासाठी जो कोणी सतत प्रयत्नशील राहील, त्याला जीवनात कधीच अपयश येणार नाही. परंतु दुर्दैवाने आजच्या परिस्थितीत व्यक्ती आपल्या या तिन्ही मातांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्याला तसे परिणामही भोगावे लागत आहे. विविध प्रकारचे कष्ट व वेदना सहन करीत आई आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून अथक प्रयत्न करते. तोच मुलगा पुढे जाऊन आपल्या आईला वाडीत टाकून निघून जातो व मागे वळून पाहत नाही. आईच्या दुधाला विसरुन व गाईच्या दुधाकडे दुर्लक्ष करुन बाजारातील नकली दुधाचा उपयोग करतो. त्यामुळे त्याची मानसिक वृत्ती विकृत झालेली असते. गोमातेबद्दल आजचा शेतकरीसुद्धा निर्दयी झालेला दिसतो व ती वृद्ध झाल्यावर कसायला विकून टाकतो. एका शेतकऱ्याने एका देशी गायची सेवा केली तर त्याला उत्तम प्रकारे नैसर्गिक शेती करण्यासाठी फार उपयोगी व महत्वाची ठरेल. रासायनिक खताचा वापर टाळून गोमूत्र आणि शेनापासून तयार झालेले खत शेतीत वापरले तर उत्तम व दर्जेदार पीक येईल व गाईच्या दुधाचे सेवन करणाऱ्याला आईचेसुद्धा महत्व कळेल. तसेच भूमातेलासुद्धा वाचविता येईल. त्यांनी पदमश्री डॉ. सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र कोणकोणते याबद्दल सविस्तर सांगितले. रामरतन राऊत यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील शेतजमीन व तिचे उर्वरकतेबद्दल व गुण वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. चाचेरचे विरेंद्र बरबडे यांनी जमिनीची पोत टिकवून ठेवण्यासाठी धानाच्या शेतीबरोबरच बागायती फळाच्या शेतीचे महत्व सादर केले. याप्रसंगी काही स्थानिक शेतकऱ्यांनीसुद्धा आपले बरे-वाईट अनुभव कथन केले. कार्यक्रमात महिला शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. संचालन रघुनाथ चुटे यांनी केले. आभार सेवक बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेश बोहरे, डॉ. रामेश्वर दोनोडे, चंद्रभान मुनेश्वर, सुनील फुंडे, पप्पू पठाण, राजकुमार थेर, तारकेश्वर ब्राम्हणकर, चंद्रकांत गजभिये, नामदेव दोनोडे, मुकेश रामटेके, परिम कोरे, मोहन दोनोडे, राजू भांडारकर, मुकेश फुंडे, चुटे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)