हक्कांबद्दल जाणीव आवश्यक
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:07+5:302016-04-03T03:51:07+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही.

हक्कांबद्दल जाणीव आवश्यक
संजय पुराम : मानवाधिकार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन
सालेकसा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७० वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुध्दा समाजातील अनेक लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव नाही. जाणीव नसल्यामुळेच कमजोर वर्गातील पिडीतांची नेहमी आर्थिक व सामाजिक पिळवणूक होत राहीली. समाजातील घटकाचा विकास घडवायचा असेल तर मानवी हक्काबद्दल प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. ते तालुक्यातील ग्राम झालिया येथे मानवाधिकार संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, माजी पं.स.सभापती यादनलाल बनोठे, सरपंच मनोज दमाहे, उपसरपंच हेमराज सुलाखे, तंटामुक्त समिती अध्यक्ष धरमदास कुराहे, पोलीस पाटील कविता कुराहे, आयोगाचे जिल्हाध्यक्ष कुरैशी, लेखिका उषा किरण आत्राम व अन्य उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पुराम यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार देणारी राज्यघटना निर्माण केली. परंतु त्या राज्यघटनेत लिहीलेल्या गोष्टीपासून आजही अनेक लोक अनभिज्ञ आहेत आणि पारंपारिक गुलामगिरीत जगत आहेत. अशा लोकांमध्ये आपल्या हक्काविषय जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी काही सरकारी-गैरसरकारी संगठना मोलाची भूमिका पार पाडत असतात. यामध्ये मानवाधिकार आयोग यशाची वाटचाल करीत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधीत केले. संचालन करून आभार सोहन दमाहे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कैलास दमाहे, कस्तुरचंद जोग, देवराम बरैया, अशोक शेंडे अदिंनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)