शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

बहुजन समाजाने हक्कासाठी संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:23 AM

बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : गंगा जमुना देवस्थानात स्रेहमिलन कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : बोंडगावदेवी हे गाव पवित्र अशा जागृत मॉ गंगा जमुना मातेचे देवस्थान आहे. गावात विविध जाती, पंथ व धर्माचे लोक आपुलकीने गुण्या गोविंदाने राहत आहेत. धार्मिकतेची तशीच राजकीय कारकीर्दीची नाळ गावासोबत जोडली जात आहे. गावचे पावित्र्य कायम ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याची परंपरा वाढीस लागणार नाही. यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून गाव एकसंघ करुन सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर लक्ष केंद्रीत न करता बहुजन समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी संघटित होणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.येथील मॉ गंगा जमुना देवस्थानच्यावतीने देवस्थान परिसरात परंपरेनुसार चालत असलेल्या गावातील सर्वधर्म समभाव चहापान व होळीमिलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य डॉ. शामकांत नेवारे, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, आनंदकुमार जांभुळकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष तुळशीदास बोरकर, नित्यानंद पालीवाल, मोरेश्वर बनपूरकर, माजी सरपंच रामकृष्ण मेश्राम, भाग्यवान फुल्लुके, ताराचंद सुखदेवे, पुंडलिक भैसारे, दयाराम बारसागडे, संतोष टेंभूर्णे, लाला मेश्राम, ग्रा.पं. सदस्य साधू मेश्राम, अशोक रामटेके, देवस्थानचे मुख्य पुजारी हेमराज मानकर उपस्थित होते.मागील २० फेब्रुवारी २०१६ मध्ये गावातील हिंदू व बौद्धांमध्ये जागेच्या प्रकरणावरुन सामाजिक तेढ निर्माण होऊन एकोप्याने राहणारा गाव दुभंगला. दोन समाजामधील वाद पराकोटीला गेला. याला मूठमाती देऊन गावात समतेचा संदेश देण्यासाठी समस्त गावकरी एकदिलाने राहण्यासाठीच होळी मिलनाचे औचित्य साधून सर्वधर्म समभाव चहापान कार्यक्रम आयोजित करुन नाना पटोले यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. पुढे बोलताना पटोले यांनी, सामाजिक तेढ दोन्ही समाजाला घातक आहे. त्यामुळे समाजाची अपरिमित हाणी होऊन समाजाच्या विकासाला बाधा निर्माण होते. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिल्यानेच कुटुंबासह गावाच्या विकासात भर पडते. वादात सामाजिक जनता नाहक भरडली जाते. धर्माच्या नावावर वाद निर्माण करुन गालबोट लागते.समाजातील कटूता दूर सारुन समस्त गावकऱ्यांनी एकत्र येवून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन डॉ. शामकांत नेवारे यांनी केले. आभार सुरेंद्रकुमार ठवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुळशीदास बोरकर, हेमराज मानकर, कुंडलिक मानकर, मुकेश मानकर यांनी सहकार्य केले.