शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

भाजपकडून देशहिताची अपेक्षा करणे चुकीचे : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 15:23 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे आरएसएसच्या अजेंड्यावर काम करीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधानाला बोनससाठी प्रयत्न करणार

गोंदिया : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे योगदान विसरणारे नसून, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यावेळीही आताच्या भाजप म्हणजे जनसंघासह आरएसएसच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही. त्यांनी नेहमीच स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातच काम केल्याने त्यांच्याकडून देशहिताची अपेक्षा करणे चुकीचे आहे. ते देशद्रोहींना पाठिंबा देणारे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

गोंदिया येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हा मेळावा व पदग्रहण सोहळ्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ज्या सिनेअभिनेत्रीला केंद्र सरकारने ‘पद्मश्री’करिता निवडले, तिने देशाच्या स्वातंत्र्यावरच आक्षेप घेणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुबीयांसह सर्व देशवासीयांचा अवमान केलेला आहे. यापूर्वीसुद्धा याच अभिनेत्रीने मुंबईला पीओके म्हणत आपल्या अकलेचे तारे तोडले होते. अशा अभिनेत्रीला दिलेला पद्मश्री पुरस्कार लगेच परत घ्यायला हवे. परंतु, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे आरएसएसच्या अजेंड्यावर काम करीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच

काँग्रेस पक्ष नेहमीच आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी पुढे राहिलेला असून, आजपर्यंत झालेल्या सर्वच पोटनिवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच आघाडीवर राहिलेला आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काँग्रेस पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टीनेच स्वबळावर लढण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.

धानाला बोनस मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने धानाला ७०० रुपये बोनस मिळत आहे. यापूर्वी कोरोनाची परिस्थिती जेवढी भयावह होती, त्यास्थितीत शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार बोनस देऊ शकते, तर सध्या तर कोरोना नियंत्रणात आला असून सरकार आता कामाला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळीही बोनस मिळेल यासाठी विधानसभेत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस