शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

भाजपकडून देशहिताची अपेक्षा करणे चुकीचे : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 15:23 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे आरएसएसच्या अजेंड्यावर काम करीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देधानाला बोनससाठी प्रयत्न करणार

गोंदिया : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे योगदान विसरणारे नसून, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यावेळीही आताच्या भाजप म्हणजे जनसंघासह आरएसएसच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही. त्यांनी नेहमीच स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातच काम केल्याने त्यांच्याकडून देशहिताची अपेक्षा करणे चुकीचे आहे. ते देशद्रोहींना पाठिंबा देणारे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

गोंदिया येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हा मेळावा व पदग्रहण सोहळ्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ज्या सिनेअभिनेत्रीला केंद्र सरकारने ‘पद्मश्री’करिता निवडले, तिने देशाच्या स्वातंत्र्यावरच आक्षेप घेणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुबीयांसह सर्व देशवासीयांचा अवमान केलेला आहे. यापूर्वीसुद्धा याच अभिनेत्रीने मुंबईला पीओके म्हणत आपल्या अकलेचे तारे तोडले होते. अशा अभिनेत्रीला दिलेला पद्मश्री पुरस्कार लगेच परत घ्यायला हवे. परंतु, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे आरएसएसच्या अजेंड्यावर काम करीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच

काँग्रेस पक्ष नेहमीच आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी पुढे राहिलेला असून, आजपर्यंत झालेल्या सर्वच पोटनिवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच आघाडीवर राहिलेला आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काँग्रेस पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टीनेच स्वबळावर लढण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.

धानाला बोनस मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने धानाला ७०० रुपये बोनस मिळत आहे. यापूर्वी कोरोनाची परिस्थिती जेवढी भयावह होती, त्यास्थितीत शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार बोनस देऊ शकते, तर सध्या तर कोरोना नियंत्रणात आला असून सरकार आता कामाला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळीही बोनस मिळेल यासाठी विधानसभेत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस