अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांचे आंदोलन
By Admin | Updated: February 1, 2015 22:59 IST2015-02-01T22:59:55+5:302015-02-01T22:59:55+5:30
अपंग मुलांच्या शिक्षणासाठी शासन केवळ दाखविण्यासाठी कायदे करते. प्रत्यक्ष हे अपंग मात्र वंचितच राहतात. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी विशेष गरजाधारक विद्यार्थी पालक

अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांचे आंदोलन
गोंदिया : अपंग मुलांच्या शिक्षणासाठी शासन केवळ दाखविण्यासाठी कायदे करते. प्रत्यक्ष हे अपंग मात्र वंचितच राहतात. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी विशेष गरजाधारक विद्यार्थी पालक संघाच्या वतीने सोमवारी २ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना रोज व नियमित विशेष शिक्षण मिळावे, अपंग विद्यार्थ्यांना नियमित अपंग शिक्षणातील शिक्षण घेतलेल्याच शिक्षकांकडून शिक्षण देण्यात यावे, अपंग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अपंग शिक्षणातील पदवी व पात्रता असलेल्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, कर्णबधीर विद्यार्थ्यांना अपंगाचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, अपंग विद्यार्थी दाखल असलेल्या शाळांमध्ये अपंग शिक्षणाची पात्रता व पदवी असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अनुकूलीत अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
अपंग व्यक्ती समान संधी कायदा १९९५ व बालकांचा कायद्यानुसार (आरटीई २००९) नियमित गरजेनुरूप व मातृभाषेतून शिक्षण मिळणे बंधनकारक आहे. पण अपंग मुलांना शाळेमध्ये फक्त कुबड्या, चाकाचे सायकल, चष्मे, कानाची मशीन याशिवाय दुसरे काहीही मिळत नाही. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा विशेष शिक्षक येतात, शिकवितात व दुसऱ्या अपंग मुलांकडे शिकविण्यासाठी निघून जातात. चांगल्या मुलांना रोजच पूर्णवेळ शिक्षक शिकवितात. मग अपंग मुलांना आठवड्यातून केवळ दोनच दिवस का शिकविले जाते, असा सवाल अपंग मुलांच्या पालकांनी केला आहे. शाळेतील शिक्षक म्हणतात की आम्ही अपंग मुलांना शिकवू शकत नाही. अपंग मुलांना शिकविण्यासाठी अपंगांचे शिक्षण घेतलेले शिक्षक हवे आहेत.मतिमंद, मुकबधीर, अंध मुलांसाठी वेगळे शिक्षक असतात. मग आमच्या मुलांना कोण शिकविणार, असाही प्रश्न सर्व विशेष गरजाधारक अपंग विद्यार्थी पालकांनी विचारला आहे.
शासन अपंगांसाठी केवळ दाखवायचे कायदे करतो. कायदा सर्व मुलांसाठी सारखा असावा. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठीच विशेष गरजाधारक विद्यार्थी पालक संघाने सदर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)