शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा शेवटच्या टप्प्यात; प्रकल्प मात्र रितेच

By कपिल केकत | Updated: September 4, 2023 17:15 IST

फक्त पाच प्रकल्पच फुल्ल : दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता

कपिल केकत

गोंदिया : यंदा पावसाच्या लहरीपणाने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. हेच कारण आहे की, पावसाळा आता शेवटच्या टप्प्यात आला असूनही जिल्ह्यातील ३२ मध्यम व लघु प्रकल्पांतील फक्त पाच प्रकल्पच पाण्याने शंभर टक्के भरून आहेत. मात्र, अन्य प्रकल्पांमध्ये पाणी नसून त्यातही कित्येकांत ठणठणाट आहे. मागील वर्षी हेच प्रकल्प शंभर टक्के भरून होते व ते पाणी आतापर्यंत कामी आले. अशात आता दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता असून, असे न झाल्यास मात्र पुढील वर्ष कठीण जाणार आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने दया दाखविली नाही. परिणामी, जून कोरडाच गेला व शेतकऱ्यांना शेतीची कामे करता आली नाही. जुलै महिन्यात पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने शेतीची कामे सुरू झाली व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. जुलै महिन्यातील पावसामुळेच नदी-नाले व प्रकल्पांत पाणी आले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, ऑगस्ट महिन्यात थोडाफार बरसल्यानंतर पावसाने परत दडी मारली आहे. परिणामी, प्रकल्पांत पाणी आले नाही व त्यांची तहान अद्याप भागलेली नाही. आता पावसाळा शेवटच्या टप्प्यात असून, ३० सप्टेंबरपर्यंत सतत दमदार पावसाची गरज आहे. कारण, असे न झाल्यास पुढील वर्षासाठी मात्र त्रास जाणार यात शंका नाही.

१५ प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर पाणीसाठा

जिल्ह्यात ९ मध्यम तर २३ लघु प्रकल्प आहेत. यातील फक्त कटंगी मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा असून, डोंगरगाव, मोगरा, बेवारटोला व भुराटोला या चार लघु प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय, बोदलकसा, चुलबंद, रंगेपार या तीन मध्यम प्रकल्प व आक्टीटोला, पिपरीया, राजोली, सडेपार, जुनेवानी व उमरझरी या सहा लघु प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये याही पेक्षा कमी साठा असून, यावरून जिल्ह्यात पाण्याची किती गरज आहे, हे दिसून येते.

मागील वर्षी होते लबालब

मागील वर्षी जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळेच अति दमदार पाऊस बरसला होता. यामुळेच मागील वर्षी या काळात जिल्ह्यातील मुख्य प्रकल्पांसोबतच मध्यम व लघु प्रकल्पही पाण्याने लबालब होते. यंदा मात्र पाऊस पाहिजे तसा बरसलेला नाही. परिणामी, प्रकल्पांत पाणीसाठा नाही. मागील वर्षीच्या पाण्यामुळेच यंदा जिल्ह्यात रब्बी हंगाम पिकला. आता उरलेल्या काळात पावसाने साथ दिली तरच या प्रकल्पांची तहान भागणार व पुढील वर्षासाठीही सोय होणार.

या प्रकल्पांची दयनीय स्थिती

- जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांत फक्त नाममात्र पाणीसाठा असून, त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामध्ये गुमडोह प्रकल्पात ३४.५३ टक्के, कालीमाती प्रकल्पात २०.८४ टक्के, रेहाडी प्रकल्पात ३७.९९ टक्के, सोनेगाव प्रकल्पात २८.६७ टक्के, सालेगाव प्रकल्पात २८.३५ टक्के तर ओवारा प्रकल्पात फक्त ४९.५७ टक्केच पाणीसाठा आहे.

मुख्य प्रकल्पांतील पाणीसाठा

प्रकल्प - पाणीसाठा टक्केवारी

इटियाडोह - ७८.२८

सिरपूर - ६७.०६

कालीसरार - ६१.७८

पुजारीटोला - ५९.१३

ऑक्सिजनवरील लघु प्रकल्प

प्रकल्प - टक्केवारी

गुमडोह- ३४.५३

कालीमाती- २०.८४

रेहाडी- ३७.९९

सोनेगाव- २८.६७

सालेगाव- २८.३५

ओवारा- ४९.५७

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरणwater shortageपाणीकपातgondiya-acगोंदिया