शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

मलमपट्टीसाठी मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:46 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त येणाºया केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांचा अजब कारभार : वैद्यकीय महाविद्यालय नावापूरतेच, आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त येणाºया केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे. गंभीर रूग्णांनासुद्धा तास-तासभर उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते. तर मलमपट्टीसाठी पैसे मोजावे लागतात. ऐवढेच नव्हे तर डॉक्टरांनी रुग्णांना पाच दिवसांचे औषध लिहून दिल्यानंतर फार्मासिस्ट मात्र तीनच दिवसांचे औषध देतात. हा सर्व प्रकार लोकमत चमूने बुधवारी या रुग्णालयाच्या फेरकफटका मारला असता उघडकीस आला.जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने येथे जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू केले. अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यासाठी आलेल्यांनाही दोन-दोन तास पर्यंत वाट पहावी लागते.मात्र या रुग्णालयातील कर्मचाºयांच्या चुकीच्या धोरणामुळे येथे येणाºया रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना औषधे तसेच योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड नागरिकांची होती. दोन दिवसांपूर्वी काही दोन रुग्णांनी लोकमत कार्यालयात येवून त्यांची कैफियत मांडली होती. याचीच दखल लोकमत चमुने बुधवारी (दि.१५) रुग्णालयाचा फेरफटका मारला. त्यात रुग्णांची ओरड योग्य असल्याची बाब पुढे आली.दरम्यान या सर्व प्रकाराबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगत यावर अधिक बोलण्यास नकार दिला.२० रुपये मोजल्यावरच मलमपट्टीरतनारा येथील शिवाजी नागरिकर (४७) यांचा दुचाकी स्लिप होवून ९ आॅक्टोबरला अपघात झाला. यात त्यांच्या अंगठ्याला जखम झाली. त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात १० रूपयांची शुल्क भरून चिठ्ठी काढली व डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी करण्यासाठी त्यांना पट्टीबंधक विभागात पाठविले. मात्र तेथे कार्यरत कर्मचाºयाने त्यांच्याकडे २० रूपयांची मागणी केली. पैसे द्याल तेव्हाच मलमपट्टी होईल. अन्यथा परत जा, असे सांगितले. शासकीय रूग्णालयात पैसे द्यावे लागत नाही, असे मला वाटले. पैसे न दिल्यामुळे मलमपट्टी न झाल्याने त्यांना तासभर वाट पहावी लागली. शेवटी पैसे दिल्यावरच सदर सदर कर्मचाºयांने मलमपट्टी करुन दिल्याचे सांगितले. हाच प्रकार त्यांच्यासोबत बुधवारी (दि.१५) सुध्दा घडला.पट्टीबंधक विभागात पैसे घेतल्याशिवाय मलमपट्टी केली जात नाही. विशेष म्हणजे जखमेनुसार मलमपट्टीचे पैसे घेतले जातात. त्याची कुठलीही पावती रुग्णांना दिली जात नाही. ही देखील या दरम्यान पुढे आली.पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांचे औषधजिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू असलेल्या ओपीडीमध्ये रूग्णांची तपासणी करणारे डॉक्टर त्यांना पाच दिवसांचे औषध लिहून देतात. मात्र रूग्ण जेव्हा औषध वितरण विभागात जातात तेव्हा त्यांना तेथील कर्मचाºयांकडून केवळ तीन दिवसांचे औषध दिले जाते. कर्मचारी रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचा सल्ला देतात. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा असल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याची बाब सुध्दा निदर्शनास आली.शस्त्रक्रियेसाठी लागतो ‘वशीला’गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय आल्यानंतर बीजीडब्ल्यू व केटीएस येथील कारभार अधिष्ठाता यांच्या हातात गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांची शस्त्रक्रिया या वैद्यकीय महाविद्यालयात करण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णाला आणल्यावर त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. येथील डॉक्टरांना पैश्याची अपेक्षा असते की काय कामच होत नाही. एखादे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार किंवा बड्या अधिकाºयांचा फोन त्या डॉक्टरांना आल्याशिवाय रूग्णांची शस्त्रक्रियाच होत नाही. गरीब रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी ‘वशीला’ (जॅक) लावावा लागतो. येथील रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्यामुळे शस्त्रक्रियेस उशीर होत असल्याची ओरड डॉक्टरांची असते.गंभीर रूग्ण दोन तास एक्स-रेसाठी रांगेतरतनारा येथील सरिता लिल्हारे या महिलेच्या डोळ्याजवळ व डोक्यावर जखम झाल्याने तिला तिच्या कुटुंबीयांनी जिल्हा रूग्णालयात आणले होते. ती महिला सकाळी ९ वाजतापासून ११ वाजतापर्यंत एक्स-रे साठी रांगेत बसून होती. दोन तासांच्या नंतरही तिला एक्स-रे साठी बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे तिची प्रकृती अधिक बिघडत चालली होती. रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तिच्यासह कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल