दलित वस्ती सुधार योजनेचा दुरूपयोग
By Admin | Updated: May 30, 2014 00:11 IST2014-05-30T00:11:47+5:302014-05-30T00:11:47+5:30
अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले.

दलित वस्ती सुधार योजनेचा दुरूपयोग
गोंदिया : अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले. मात्र या पथदिव्यांना दलित वस्तीत न लावता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर लावण्यात आले आहे. हा दलित वस्तीच्या सुधारणेसाठी मिळणार्या निधीचा दुरूपयोग आहे, असा आरोप माजी सरपंच, विद्यमान ग्रा.पं. सदस्यासह गावकर्यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास या योजनेचे पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना होते. या योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये १८ फेब्रुवारी २0१४ रोजी पुरविलेले १0 सौर पथदिवे चांगल्या स्थितीत असल्याने कटंगीकला ग्रामपंचायतने स्वीकारले. या कटंगीकलाच्या सरपंचाने वार्ड-३ व वार्ड-४ येथे दलित वस्तीच्या योग्य ठिकाणी सौर पथदिवे न लावता ग्रामपंचायत सदस्यांच्या हितासाठी व गैरवापरासाठी लावून दिले. हे कृत्य जनताविरोधी व शासन फसवणुकीचे असल्याचे आरोप माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत व ग्रा.पं. सदस्य अनिल तिराले यांनी केले आहेत.
कटंगीकला येथील काही ग्रा.पं. सदस्य दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या सौर पथदिव्यांना दलित वस्तीमध्येच लावण्यात यावे, अशी मागणी करीत आहेत. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर बेकायदेशीरपणे व स्वत:च्या मनमर्जीने सौर पथदिवे लावण्यात आले आहेत.
शासनाच्या योजनेचा लाभ जनतेला न मिळता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच बळकावला. त्यांनी आपापल्या घरासमोरच सदर पथदिवे लावले. या गैरकृत्यासाठी सरपंच व काही सदस्य जबाबदार असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ दलितांना देण्यात यावा, अशी मागणी कटंगीकला वासीयांनी केली आहे.
याशिवाय सरपंच, उपसरपंच व सचिव ग्रामस्थांना विविध योजनांचा फायदा मिळू देत नाही. योजनांचा लाभ ते केवळ आपल्या पसंतीच्याच लोकांना देत आहेत. सामाजिक वनीकरणची कार्ये उपसरपंच यांच्या पत्नीला देण्यात आली आहेत. शिवाय ग्रामपंचायतीच्या कामांची ठेकेदारी येथील ग्रामपंचायत सदस्यच करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या सर्व प्रकरणांची योग्य चौकशी करून त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल तिराले, राजूसिंह बैस, प्रतिभा डोंगरवार, विनोद वर्हाडे, मुरलीधर बावणकर, किर्ती राऊत, रेवन चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)