शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

वाहतुकीचेे नियम पाळण्याचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST

केशोरी : १८ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान पाळण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणेदार संदीप इंगळे ...

केशोरी : १८ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान पाळण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे यांच्या पथकाने येथील गाव प्रवेशद्वारावर नियमित अभियान राबवून वाहतुकीच्या नियमाचा संदेश पोहाेचविण्याचा एक अभिनव उपक्रम पथनाट्यातून राबविला आहे.

कोरोना संकटावर मात करुन शासनाच्या निर्देशानुसार या परिसरातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाले आहेत. शाळेत येताना विद्यार्थी दुचाकी वाहनांचा वापर करतात. त्यांच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना सुद्धा नसतो. त्यांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव राहत नाही. वाहन वेगाने चालविण्याशिवाय त्यांना काहीच समजत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. मुख्यत्त्वाने हेच दृष्टी समोर ठेवून सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधत वाहतुकीचे नियम अवगत व्हावे, विना परवाना दुचाकी गाडी चालवू नये, वाहतुकीच्या चिन्हांचे पालन व्हावे, दुचाकी वाहनावर २ पेक्षा अधिक व्यक्ती बसवू नये, बेशिस्तपणे वाहन चालवू नये, हेल्मेटचा वापर करावा या सर्व नियमांची वाहन चालकांना जाणीव व्हावी म्हणून येथील ठाणेदार इंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या पथकाने येथे रस्ता सुरक्षा अभियान राबविले. या अंतर्गत, पथनाट्यातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश पोहाेचविण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.