शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:29+5:302021-08-23T04:31:29+5:30

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव ...

Mental health of parents along with children deteriorated due to school closure! | शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव गेला. त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पालकही विविध प्रकारचे टेंशन घेऊन जगत आहेत. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे जणू परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे चित्र आहे.

देशात ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी कुटुंब आप्त जणांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. साेबतच मुलांच्या शाळा सुरू झाल्या नाही. आर्थिक गणित बिघडले आहे.

................................

मुलांच्या समस्या

- मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे मुले घरी राहून खाणे, झोपणे, मोबाइलवर गेम खेळणे इथपर्यंतच सीमित झाले आहेत.

- मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. शरीराचा व्यायाम कमी होत आहे. घरातच राहात असल्याने त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.

- मुले पालकांना फिरायला जाण्याचा अट्टाहास करतात. पैश्यांच्या चणचणीमुळे वडीलधारी त्यांना बाहेर फिरायलाही नेत नाही.

.............

पालकांच्या समस्या

- मुलांना ऑनलाइन शिक्षणाकरिता महागडे मोबाइल खरेदी करून दिले. परंतु पाल्यांचा कल व्हिडिओ गेमकडे असल्याने पालक त्रस्त आहेत.

- मुलांना शिकण्यापेक्षा वाईट सवयी तर लागणार नाहीत याची भीती आहे. मुलांना घरी २४ तास सांभाळणे ही मोठी कसरत आहे.

- मुलांच्या भविष्याची चिंता व कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली त्याची चिंता आहे. कौटुंबिक कलहदेखील वाढत आहे.

.........................

कोट

कर्जबाजारीपणा, कौटुंबिक हिंसाचार, कोरोनात आप्त स्वकीयांचा झालेला मृत्यू यामुळे खचून लोकांची मानसिकता खालावत चालली आहे. मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. पुरुषांची मानसिकता आर्थिक आणि सामाजिकमुळे खालावते तर महिलांची मानसिकता भावनिकतेमुळे खालावते. विविध कारणांमुळे असह्य मानसिक वेदना झाल्यामुळे सुटकेची तीव्र इच्छा तयार होते. त्यातून लोक आत्महत्या करतात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

.........

कोट

सततच्या बंधनामुळे मानसिकता खालावते. यातून आत्महत्यासारख्या घटनाही घडू शकतात. अशी पाळी कुणावरही येऊ नये यासाठी कुटुंबीयांनी व मित्रमंडळींनी यासाठी तत्पर असायला हवे. सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले. त्यात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून निदान आणि उपचार मोफत दिले जाते.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया

............

पहिली- १४५६५

दुसरी- १८५४२

तिसरी- २०१७६

चौथी- २०४०६

पाचवी- १९५९६

सहावी- १९४६४

सातवी- २००६३

आठवी-२०६०१

नववी- २०७७२

दहावी- २२५२२

Web Title: Mental health of parents along with children deteriorated due to school closure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.