शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

गरजूंसाठी धावले खालसा सेवा दल सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.

ठळक मुद्देतीन हजार जणांच्या जेवणाची जबाबदारी : रूग्णालयातील गरजूंचा दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे आज रूग्णालयात असलेल्या रूग्णांच्या नातेवाईक तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. मात्र या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलने घेतली असून दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरण करीत आहे. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांसोबतच शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रूग्णांच्या नातेवाईकांना खालसा सेवा दलकडून जेवण पुरविले जात आहे.कोरोनाच्या कहरमुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेले तसेच शहरातील भिकारी मात्र उघड्यावर आले आहेत.सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिले जात आहेत. यातील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालय तसेच म्युनिसिपल शाळेतील भिकाºयांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलची विशेष गाडी जात आहे. तर अन्य रूग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहचवून देत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे तसेच पॅकेट बनविण्यासाठी आजघडीला सुमारे ७०-८० महिला-पुरूषांची टीम सेवा देत आहे. यामुळे दररोज तीन हजार गरजूंना मदत होत आहे.२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेतयेथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रूग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार मान यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुबीयांना सांगीतले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.रुग्णांसह अनेकांना होतेय मदतखालसा सेवा दलकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकावर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली असून दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये केटीएस, बीजीडब्ल्यूमधील सुमारे दोन हजार २०० जणांचा समावेश त्यांना गाडीने जेवण पोहचविले जात आहे. तर अन्य खासगी रूग्णालयातील सुमारे ८०० जणांना कार्यकर्ते दुचाकीने पॅकेट पोहचवित आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस