शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

मेहताखेडा नागपूर विभागात तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:28 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : जिल्ह्यात प्रथम क्रमांक, ११ लाखांचे पुरस्कार पटकावले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.मेहताखेडा गावची विशेषता म्हणजे थोर संतांच्या नावानेच प्रवेश होतो. गावात ठिकठिकाणी ‘स्त्रियांचा सन्मान हिच मेहताखेडाची शान’ ही म्हण लिहिलेली आहे. याद्वारे गावात स्त्रियांचा सन्मान केला जात असून गावातील सर्व कुटुंबांचे घर व मालमत्ता ही स्त्रियांच्या नावानेच आहे.गावात प्रत्येक घरी शोषखड्डे आहेत. गावच्या बाजूला कंपनी असल्याने गावात रोजगार मिळाला आहे. प्रत्येक भिंतीवर सुविचार आहेत. या गावात सर्व घरे मातीची असून ति ही स्वच्छ आहेत. तसेच गावात रोज सकाळ व सायंकाळ ६ वाजता ग्रामपंचायत अंतर्गत स्वयंचलित साऊंड संचद्वारे स्वच्छता विषयक प्रार्थना व चांगले विचार पोहोचविले जातात. यात आदर्श गाव वाटोडाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचेही विचार याद्वारे ऐकविले जातात. यासोबतच गावात पूर्णत: दारुबंदी आहे. गावात हायमास्य लाईट आदिंची सोय असून डिजीटल बोर्ड लावले असून त्यात वेळ, दिनांक व तापमान दररोज दर्शविले जाते.मेहताखेडाला आदर्श गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी खूप मदत व मेहनत केली आहे. हे आदर्श गाव येथील ग्रामसेवक सुमेध बंसोड यांच्या नवनवीन कल्पना, सामाजिक भावना तसेच उच्चशिक्षीत सरपंच महाराजी जगत सलामे व उपसरपंच आसोबाई अरकरा, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुंजाम, मन्नू मडावी, माधुरी नरेटी, उषा मडावी, कल्पना सर्पा, यमुना कुंजाम, उपसिंग सर्पा व सर्व गावकºयांच्या सहकार्याने मोठे झाले आहे.वॉटर एटीएमला पुलवामा शहिदांचे नावयेथील गावकऱ्यांनी शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याची वॉटर एटीएमद्वारे सोय उपलब्ध करुन दिली आहे. शुद्ध पाण्याच्या दोन्ही वाटर एटीएमला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले शहीद नितीन राठोड व शहीद संजयसिंग दिक्षीत यांची नावे देवून देशाभिमान जागृत केला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान