शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मेहताखेडा नागपूर विभागात तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:28 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : जिल्ह्यात प्रथम क्रमांक, ११ लाखांचे पुरस्कार पटकावले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.मेहताखेडा गावची विशेषता म्हणजे थोर संतांच्या नावानेच प्रवेश होतो. गावात ठिकठिकाणी ‘स्त्रियांचा सन्मान हिच मेहताखेडाची शान’ ही म्हण लिहिलेली आहे. याद्वारे गावात स्त्रियांचा सन्मान केला जात असून गावातील सर्व कुटुंबांचे घर व मालमत्ता ही स्त्रियांच्या नावानेच आहे.गावात प्रत्येक घरी शोषखड्डे आहेत. गावच्या बाजूला कंपनी असल्याने गावात रोजगार मिळाला आहे. प्रत्येक भिंतीवर सुविचार आहेत. या गावात सर्व घरे मातीची असून ति ही स्वच्छ आहेत. तसेच गावात रोज सकाळ व सायंकाळ ६ वाजता ग्रामपंचायत अंतर्गत स्वयंचलित साऊंड संचद्वारे स्वच्छता विषयक प्रार्थना व चांगले विचार पोहोचविले जातात. यात आदर्श गाव वाटोडाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचेही विचार याद्वारे ऐकविले जातात. यासोबतच गावात पूर्णत: दारुबंदी आहे. गावात हायमास्य लाईट आदिंची सोय असून डिजीटल बोर्ड लावले असून त्यात वेळ, दिनांक व तापमान दररोज दर्शविले जाते.मेहताखेडाला आदर्श गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी खूप मदत व मेहनत केली आहे. हे आदर्श गाव येथील ग्रामसेवक सुमेध बंसोड यांच्या नवनवीन कल्पना, सामाजिक भावना तसेच उच्चशिक्षीत सरपंच महाराजी जगत सलामे व उपसरपंच आसोबाई अरकरा, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुंजाम, मन्नू मडावी, माधुरी नरेटी, उषा मडावी, कल्पना सर्पा, यमुना कुंजाम, उपसिंग सर्पा व सर्व गावकºयांच्या सहकार्याने मोठे झाले आहे.वॉटर एटीएमला पुलवामा शहिदांचे नावयेथील गावकऱ्यांनी शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याची वॉटर एटीएमद्वारे सोय उपलब्ध करुन दिली आहे. शुद्ध पाण्याच्या दोन्ही वाटर एटीएमला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले शहीद नितीन राठोड व शहीद संजयसिंग दिक्षीत यांची नावे देवून देशाभिमान जागृत केला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान