शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मेहताखेडा नागपूर विभागात तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:28 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : जिल्ह्यात प्रथम क्रमांक, ११ लाखांचे पुरस्कार पटकावले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.मेहताखेडा गावची विशेषता म्हणजे थोर संतांच्या नावानेच प्रवेश होतो. गावात ठिकठिकाणी ‘स्त्रियांचा सन्मान हिच मेहताखेडाची शान’ ही म्हण लिहिलेली आहे. याद्वारे गावात स्त्रियांचा सन्मान केला जात असून गावातील सर्व कुटुंबांचे घर व मालमत्ता ही स्त्रियांच्या नावानेच आहे.गावात प्रत्येक घरी शोषखड्डे आहेत. गावच्या बाजूला कंपनी असल्याने गावात रोजगार मिळाला आहे. प्रत्येक भिंतीवर सुविचार आहेत. या गावात सर्व घरे मातीची असून ति ही स्वच्छ आहेत. तसेच गावात रोज सकाळ व सायंकाळ ६ वाजता ग्रामपंचायत अंतर्गत स्वयंचलित साऊंड संचद्वारे स्वच्छता विषयक प्रार्थना व चांगले विचार पोहोचविले जातात. यात आदर्श गाव वाटोडाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचेही विचार याद्वारे ऐकविले जातात. यासोबतच गावात पूर्णत: दारुबंदी आहे. गावात हायमास्य लाईट आदिंची सोय असून डिजीटल बोर्ड लावले असून त्यात वेळ, दिनांक व तापमान दररोज दर्शविले जाते.मेहताखेडाला आदर्श गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी खूप मदत व मेहनत केली आहे. हे आदर्श गाव येथील ग्रामसेवक सुमेध बंसोड यांच्या नवनवीन कल्पना, सामाजिक भावना तसेच उच्चशिक्षीत सरपंच महाराजी जगत सलामे व उपसरपंच आसोबाई अरकरा, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुंजाम, मन्नू मडावी, माधुरी नरेटी, उषा मडावी, कल्पना सर्पा, यमुना कुंजाम, उपसिंग सर्पा व सर्व गावकºयांच्या सहकार्याने मोठे झाले आहे.वॉटर एटीएमला पुलवामा शहिदांचे नावयेथील गावकऱ्यांनी शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याची वॉटर एटीएमद्वारे सोय उपलब्ध करुन दिली आहे. शुद्ध पाण्याच्या दोन्ही वाटर एटीएमला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले शहीद नितीन राठोड व शहीद संजयसिंग दिक्षीत यांची नावे देवून देशाभिमान जागृत केला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान