शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

जमीन व मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST

नवेगावबांध : सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमीन सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला बाहेर ...

नवेगावबांध : सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमीन सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला बाहेर काढण्यासाठी सेंद्रिय शेतीचे आपरेशन मोठ्या प्रमाणात करावे लागेल, असे परखड विचार सेंद्रिय शेतीचे समर्थक देवेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.

कृषी विभागामार्फत आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन २०२०-२१ जमीन आरोग्यपत्रिकांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आसोली येथील आयोजित दुसऱ्या शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच यादवराव मसराम होते. प्रमुख वक्ते म्हणून ललित सोनवाणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, दुधराम नाकाडे, दयाराम काळसर्पे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, नरेश बोरकर उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरखडे यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार नाही, आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही. नगदी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात, असे प्रतिपादन केले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया विकास योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना व गट शेती याबाबत सविस्तर माहिती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी दिली. माती नमुना रोग त्यावरील नियंत्रण गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्त्व प्रास्ताविकातून पंकज सूर्यवंशी यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्यासह कृषी सहायक विश्वनाथ कवासे, चिंतामण मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी कृषिमित्र गुरुदेव आकरे, भोजराम नाकाडे, पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, राजन गणवीर यांनी सहकार्य केले.