शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जमीन व मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST

नवेगावबांध : सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमीन सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला बाहेर ...

नवेगावबांध : सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमीन सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला बाहेर काढण्यासाठी सेंद्रिय शेतीचे आपरेशन मोठ्या प्रमाणात करावे लागेल, असे परखड विचार सेंद्रिय शेतीचे समर्थक देवेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.

कृषी विभागामार्फत आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन २०२०-२१ जमीन आरोग्यपत्रिकांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आसोली येथील आयोजित दुसऱ्या शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच यादवराव मसराम होते. प्रमुख वक्ते म्हणून ललित सोनवाणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, दुधराम नाकाडे, दयाराम काळसर्पे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, नरेश बोरकर उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरखडे यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार नाही, आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही. नगदी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात, असे प्रतिपादन केले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया विकास योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना व गट शेती याबाबत सविस्तर माहिती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी दिली. माती नमुना रोग त्यावरील नियंत्रण गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्त्व प्रास्ताविकातून पंकज सूर्यवंशी यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्यासह कृषी सहायक विश्वनाथ कवासे, चिंतामण मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी कृषिमित्र गुरुदेव आकरे, भोजराम नाकाडे, पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, राजन गणवीर यांनी सहकार्य केले.