नोकरीसाठी तुकडी टिकवा
By Admin | Updated: May 25, 2014 23:38 IST2014-05-25T23:38:58+5:302014-05-25T23:38:58+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेला बुट्टी मारू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नवनविन शक्कल लढविली जात आहे. तरी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ असते. यामुळे अनुदानित तुकड्या

नोकरीसाठी तुकडी टिकवा
खासगी शाळांमधील प्रकार : ‘टीसी द्या अन् सायकल घ्या’ चा उपक्रम नरेश रहिले - गोंदिया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेला बुट्टी मारू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नवनविन शक्कल लढविली जात आहे. तरी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ असते. यामुळे अनुदानित तुकड्या तुटण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांची नोकरी धोक्यात आहे. यामुळे आपली नोकरी टिकविण्यासाठी अनुदानित या शाळांतील शिक्षक तुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत दाखला घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाने १५ वर्षा अगोदर अनुदानित शाळा देण्याची खैरात वाटली. त्यामुळे ग्रामीण भागातही अनुदानित शाळांची संख्या अधिक आहे. शासनाचे अनुदान लक्षात घेता अनेक संस्थासंचालकानी एकाच शाळेत एकाच वर्गाच्या चार ते सात तुकड्या सुरू केल्या. यामुळे या सर्व तुकड्यांना शासनाचे अनुदान मिळू लागले. अनुदान कायमस्वरूपी मिळविण्याचा खटाटोप संस्था संचालकांचा सुरू झाला. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ लागल्याने या अनुदानित शाळांतील तुकड्या तुटण्याच्या मार्गावर आहेत. या तुकड्या तुटल्या तर या तुकडीतील शिक्षकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे. यामुळे आपली तुकडी वाचविण्यासाठी खासगी शाळांतील शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले. खासगी शाळांच्या संस्थासंचालकांनी तुकडी टिकविण्याची धुरा त्या शाळांतील शिक्षकांवर टाकली आहे. हे आपले नशीब समजून ते शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी पाहिजे त्या प्रकारचे आमिष विद्यार्थ्यांना देऊन आपल्या शाळेत नाव दाखल करण्यास भाग पाडतात. असाच एक प्रकार गोंदिया तालुक्याच्या शिवणी येथील संत कबीर हायस्कूलमध्ये घडला. या शाळेत इयत्ता आठवीच्या तीन तुकड्या आहेत. तर या वर्षापासून इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या प्रत्येकी एक तुकडी अंशत: अनुदानावर येत असल्याची माहतिी आहे. या तुकड्यांना टिकविण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापकीय मंडळाचा खाटोप सुरू आहे. संत कबीर हायस्कूलच्या तुकडी वाचविण्यासाठी तेथील शिक्षकांनी घिवारी, हाबूटोला, तेढवा व इतर गावातील विद्यार्थ्याना रेंजर सायकल व शैक्षणिक साहित्यासाठी एक हजार रूपये दिल्याची ओरड नजीकच्या गावातील पालकांमध्ये सुरू आहे. परंतु या शाळेचीच्या सर्व तुकड्या टिकविण्यासाठी शिवणी, गर्रा, उमरी व निलज येथील विद्यार्थ्यांची संख्या महत्वपुर्ण असते. तरी देखील या शाळेच्या शिक्षकांनी शिवणी, गर्रा, उमरी व निलज येथील विद्यार्थ्यांना मदत न करता बाहेरच्या विद्यार्थ्यांना सायकल दिल्यामुळे या चार गावातील पालकांच्या मनात आक्रोश आहे. या संदर्भात मुख्याध्यापक तनवानी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केल्यावर ते म्हणाले, आमच्या शाळेतील शिक्षकांनी बाहेरच्या गावातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याचे सांगितले. परंतु दत्तक घेतांना गरिब किंवा गरजू विद्यार्थ्यांंचा विचार करण्यात आला नाही. तर तुकडी टिकविण्यासाठी लांबपल्याच्या गावातील विद्यार्थ्यांना मदत केली.