शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Maharashtra Election 2019 : चारही मतदारसंघातून २४ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:39 AM

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतली. तर अर्जुनी मोरगाव वगळता गोंदिया, आमगाव आणि तिरोडा मतदारसंघात बंडखोरांचे आवाहन कायम आहे. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्दे४७ उमेदवार रिंगणात : बंडखोरांचे आव्हान कायम : आता होणार प्रचाराला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतली. तर अर्जुनी मोरगाव वगळता गोंदिया, आमगाव आणि तिरोडा मतदारसंघात बंडखोरांचे आवाहन कायम आहे. त्यामुळे आता चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यातही सर्वच मतदारसंघात बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडोबांना शांत करण्यात पक्षाच्या नेत्यांना कितपत यश येते आणि कोण कोण माघार घेतो, याकडे जिल्ह्यावासीयांचे लक्ष लागले होते. २७ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत एकूण ७६ उमेदवारांनी ११२ नामाकंन दाखल केले होते. ५ ऑक्टोबरला अर्जाच्या छाननीत ५ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यामुळे ७१ उमेदवार रिंगणात होते.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांच्या नजरा याकडे लागल्या होत्या. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील बंडोबांना शांत करण्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना यश आले.मात्र गोंदिया,आमगाव, तिरोडा मतदारसंघात बंडखोरी कायम असल्याने त्यांचे मन वळविण्यात पक्षाच्या नेत्यांना अपयश आले. सोमवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील २० उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली. यात माणिक घनाडे, विशाल शेंडे, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, निशांत राऊत, आनंद जांभुळकर,कैलास डोंगरे,अंजली जांभुळकर,जगन गडपाल,नितीन भालेराव,रिता लांजेवार यांचा समावेश आहे. तर आमगाव मतदारसंघातून डॉ. नामदेव किरसान आणि तिरोडा मतदारसंघातून नरेंद्र रहांगडाले, जगदीश बावनथडे, झामसिंग रहांगडाले, डॉ. नामदेव किरसान या उमेदवारांनी माघार घेतली.गोंदिया मतदारसंघातून इरफान सिध्दीकी,नामदेव बोरकर, प्रदीप वासनिक, प्रफुल भालेराव, बबन शेंडे, रामेश्वर शेंडे, विलास राऊत या उमेदवारांनी माघार घेतली. ७१ पैकी एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४७ उमेदवार रिंगणात असून यांच्यात सामना रंगणार आहे.सर्वाधिक उमेदवार गोंदिया मतदारसंघातसोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ७१ पैकी एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ४७ उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक १८ उमेदवार गोंदिया विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव आणि त्यापाठोपाठ आमगाव मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात आहेत. तिरोडा विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत.

अखेरच्या क्षणापर्यंत मनधरणीसोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे गोंदिया येथे भाजपचे विनोद अग्रवाल, तिरोडा दिलीप बन्सोड आणि आमगाव मतदारसंघात रामरतन राऊत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घ्यावे त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. तसेच काही आश्वासने देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. बंडखोर उमेदवार आपल्या भूमिकेवर कायम असल्याने त्यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना अपयश आले.

बंडखोरांचे मन वळविण्यात अपयशअर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित तीन्ही मतदारसंघात पक्षातीलच बंडखोरांचे आवाहन कायम आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल हेअपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर तिरोडा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार गुड्डू बोपचे यांच्या विरोधात राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप बन्सोड यांचे आव्हान कायम आहे.आमगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सहषराम कोरोटे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आ. रामरतन राऊत यांची बंडखोरी कायम आहे.त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दोन माजी आमदार आणि एक माजी जिल्हाध्यक्षभाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षातील बंडखोरांना शांत करण्यात सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यश आले नाही. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांमध्ये दोन माजी आमदार दिलीप बन्सोड, रामरतन राऊत आणि एक पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा समावेश आहे.त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची अडचण होण्याची शक्यता आहे.

दसऱ्यापासूनच प्रचाराचा मुहुर्तउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ४७ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे लढतीचे अंतीम चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार मंगळवारी विजयादशमीचा मुहुर्त साधत प्रचाराला सुरूवात करणार आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदिया