शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Maharashtra Election 2019 ; जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच आपली शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM

निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात पदयात्रा व प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : विरोधक मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटल्याचा आरोप करीत आहे. हे जर सत्य असते तर जनतेने आपल्याला दुसऱ्यांदा संधी दिली नसती. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांना ते कधीच जवळ करीत नाही. मात्र आपण या मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला ही बाब जनतेला सुध्दा माहिती आहे. त्यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर त्यांच्याकडून स्वागत आणि प्रेम मिळत आहे हीच त्याची खरी पावती आहे. आपल्यासाठी या मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच मोठी शिदोरी असल्याचे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे, नारायण हटवार, गुरुदेव चांदेवार, नमूदेव नागापुरे, सी.बी. टेंभुर्णे उपस्थित होते. बडोले म्हणाले, राज्यात १५ वर्षे आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणती विकास कामे केली आणि आता ते पाच वर्षांत भाजप सरकारला त्यांच्या कामाचा हिशोब मागत आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा वर्षांत जर विकास कामे केली असती आणि शेतकऱ्यांसह सवसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावल्या असत्या तर जनतेने त्यांना नाकारले नसते.आघाडी सरकारचे बोलायचेआणि करायचे एक असेच धोरण असल्याने जनतेने या दिशाभूल करणाऱ्यांचा खरा चेहरा ओळखून त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचे काम केले. भाजप सरकारने जर केवळ आश्वासने दिली असती आणि विकास कामे केली नसती तर जनता आमच्या पाठीशी उभी राहिली नसती.केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडे विकासाचा रोडमॅप तयार असून त्याच मार्गावरुन सरकारची वाटचाल सुरू आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील सर्व समस्या मार्गी लागल्याचा दावा आपण कधी करणार नाही. मात्र मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला.पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि धानाला ५०० रुपये बोनस देणे असो अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी, पेशंन देण्याचा मुद्दा असो या सर्व गोष्टी केवळ भाजप सरकारचा कार्यकाळात शक्य झाल्या हे कुणीही नाकारु शकणार नाही.अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील मतदार हे जागृक असून ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याला मनापासून साथ देतात. मागील दहा वर्षांत त्यांनी आपल्या प्रेमातून दाखवून दिले आहे. जनतेला विश्वासाला तडा जाईल असे कार्य आपण कधीच केले नाही भविष्यात सुध्दा करणार नाही. जे शक्य आहे तेच करुन दाखविण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे यापुढेही या मतदारसंघातील जनता आपल्यासोबत राहिल असा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे.

टॅग्स :arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावRajkumar Badoleराजकुमार बडोले