शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019 : प्रचारात स्थानिक मुद्यांचा पडतोय विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

निवडणूक ही कुठलीही असो त्यात आश्वासनांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकºयाच्या शेतमालाला योग्य दाम, चांगले रस्ते, सिंचनाच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच रास्त अपेक्षा जिल्ह्यातील मतदारांच्या आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे.

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांचा विकासावर भर : विरोधकांचे टिकेवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सहा दिवस शिल्लक असताना प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. चारही मतदारसंघातील उमेदवार सभा, पदयात्रा,नुक्कड सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपकडून विकासाचे दाखले दिले जात आहे तर विरोधक भाजपने केवळ पाच वर्ष घोषणांचा पाऊस पाडण्यापलिकडेच काहीच केले नसल्याची टिका केली जात आहे. एकंदरीत जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांचा सर्वांनाच विसर पडतो आहे.निवडणूक ही कुठलीही असो त्यात आश्वासनांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. मात्र आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकºयाच्या शेतमालाला योग्य दाम, चांगले रस्ते, सिंचनाच्या सुविधा, दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच रास्त अपेक्षा जिल्ह्यातील मतदारांच्या आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. धान हे भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळेच राईस सिटी आणि राईस मिल हब अशी या जिल्ह्याची ओळख होती. मात्र आता राईस मिल उद्योग डबघाईस आला असून ५०० वर राईस मिल बंद पडल्याने या उद्योगावर अवकळा आल्याने रोजगार देखील हिरावला गेला आहे. मागील दहा वर्षांत धानाच्या प्रती क्विंटल दरात केवळ ४५० रुपये वाढ झाली. तर खते, बियाणे, मजुरी आणि मशागतीच्या खर्चांत दुप्पट वाढ झाल्याने शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा ठरत आहे. लगत च्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात धानाल २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात आता केवळ तेवढा भाव देण्याचे आश्वासन दिले जात आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली येत असून वर्षभराचा खर्च भागविण्यासाठी त्याला पुन्हा सावकार आणि बँकाच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक उमेदवारांनी हे मुद्दे लावून धरण्याची अथवा त्यांचा आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याची गरज होती. मात्र दुदैवाने याच गोष्टीचा अभाव आहे. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात अदानी विद्युत प्रकल्पासारखा मोठा उद्योग आला. तर मागील पाच वर्षांत एकही मोठा उद्योग आला नाही त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. मात्र या मुद्दाकडे सुध्दा कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या उमेदवारांना स्थानिक प्रश्नांचा विसर पडत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया