वाढीव पाणी पुरवठा योजनेला अधिकार्यांचा खो
By Admin | Updated: May 23, 2014 00:03 IST2014-05-23T00:03:31+5:302014-05-23T00:03:31+5:30
ग्रामपंचायत आमगावअंतर्गत पोलिस स्टेशनजवळ वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र या नळयोजनेला टाकीत पाणी सोडणारे पाईप अजूनपर्यंत पोहोचले नाही.

वाढीव पाणी पुरवठा योजनेला अधिकार्यांचा खो
आमगाव : ग्रामपंचायत आमगावअंतर्गत पोलिस स्टेशनजवळ वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र या नळयोजनेला टाकीत पाणी सोडणारे पाईप अजूनपर्यंत पोहोचले नाही. यात वेगवेगळ्या अधिकार्यांकडून पत्राद्वारे कारवाही करण्याचे संकेत दिल्याने सध्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला खो मिळाला आहे. ग्रामपंचायत आमगाव येथे लोकसंख्येचा विचार करता वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या नळ योजनेचे काम पूर्णत्वास गेले. मात्र काहींनी या नळयोजनेचा मुद्दा प्रमुख समस्या बनवून सर्वसामान्यात आपली सर्वसामान्यात बैठक जमविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच या वाढीव नळयोजनेला नगरातील मुख्य मार्गानी पाईपद्वारे पाणी येणे गरजेचे आहे. मात्र रस्त्याचे खोदकाम झाले नाही. त्यात अनेक अडचणी तयार झाल्या आहेत. नुकतेच नगरातील मुख्य मार्गावर डांबरीकरण करण्यात आले. जर नाली खोदकामाकरिता काम सुरू केले तर रस्त्याची मोठी दयनीय हालत होईल. तसेच मुख्य मार्गावर टेलीफोन तार टाकले असल्ळाने खोदकाम करतेवळी संपूर्ण टेलिफोनचे तार विस्कळीत होतील. याचा परिणाम नगरातील नागरिकांना होईल. आता नाली खोदकाम करुन त्यात पाईप टाकणे सुरू केले तर केलेल्या डांबरी करणाची दुर्दशा होईल. तसेच टेलिफोन सेवा विस्कळीत होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टेलीफोन विभागाने ग्रामपंचायत आमगावला लेखी पत्र देवून सदर खोदकाम थांबविण्याच्या संदर्भात पत्र दिल्याचे समजते. एकंदरित वाढीव पाणी पुरवठा सुरू व्हावी ही सर्व सामान्यांची मागणी आहे. तर काहींनी या नळ योजनेला मोठा राजकीय मुद्या बनवून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. एकंदरित पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून राजकीय भांडवल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा हा प्रकार असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. अधिकार्यांच्या आरोप-प्रत्यारोपात सध्या वाढीव पाणी पुरवठा नळ योजना फसली आहे. तिला आता कोण तारणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)