अवकाळी पावसाने लाखोंची हानी

By Admin | Updated: May 13, 2016 01:49 IST2016-05-13T01:49:09+5:302016-05-13T01:49:09+5:30

जिल्ह्यात २७ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले. जवळपास प्रत्येक दिवसीच जिल्ह्यात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने नुकसान केले.

Lack of millions of losses due to incessant rains | अवकाळी पावसाने लाखोंची हानी

अवकाळी पावसाने लाखोंची हानी

शेतकरी हवालदिल : उन्हाळी उत्पन्नही घटणार
गोंदिया : जिल्ह्यात २७ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले. जवळपास प्रत्येक दिवसीच जिल्ह्यात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने नुकसान केले. त्यामुळे उन्हाळी धानपिकांची मोठ्या प्रमाणात हानी होवून शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत प्रामुख्याने चार तालुक्यांमध्ये शेतपिकांना मोठाच नुकसान पोहोचला आहे. नुकसानीची संख्या कृती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसान त्यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. कृषी विभागाने दिलेली संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातूनच सांगण्यात आले आहे.
कृषी विभागाजवळ दरदिवसी अहवाल पाठविणे आवश्यक असते. परंतु जिल्हा कृषी विभागाा तालुका कृषी विभागाने अनेक दिवसांपासून अहवाल पाठविला नाही.
जिल्हा कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, ६३३ शेतकऱ्यांची ३६०.४५ हेक्टरमधील पीक बाधित झाले आहे. त्यामुळे एकूण सात लाख १४ हजार ०५६ रूपयांचा नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
गोंदिया तालुक्यात ४० शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागला. त्यांची २५.०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना तीन लाख ६८ हजार १९३ रूपयांचे नुकसान झाले आहे.
गोरेगाव तालुक्यात ५१५ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांच्या ३१२.४८ हेक्टरमधील पिकांना क्षती पोहोचली आहे. त्यामुळे ४२ हजार ०१८ रूपयांचे नुकसान झाले.
तिरोडा तालुक्यात केवळ ३२ शेतकऱ्यांच्या १२.३५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यांना एक लाख ७३ हजार ४७५ रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४६ शेतकऱ्यांच्या १०.६० हेक्टरमधील पीक क्षतिग्रस्त झाले. त्यांना एक लाख ३० हजार ३७० रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. याशिवाय हजारो घरेसुद्धा क्षतिग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात दरदिवसी अवकाळी पाऊस, वादळ व ओलावृष्टीचे वातावरण निर्माण होत आहे. परंतु अशी परिस्थिती खुप वेळपर्यंत राहत नाही. यानंतरही काही ना काही नुकसान तर होतच आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसानीची संख्या मिळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु हे काम कासवगतीने सुरू आहे. शेतकरी त्रस्त आहेत. नागरिक चिंताग्रस्त आहेत. परंतु दिलासा मिळण्याची कसलीही संधी दिसून येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of millions of losses due to incessant rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.