शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा १.९० लाख हेक्टरवर खरिपाची लागवड

By admin | Updated: May 10, 2014 00:18 IST

गोंदिया कृषी विभागाने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जमिनीच्या क्षेत्रनिहाय विविध पिकांच्या लागवडीसाठी नियोजन केले आहे.

 देवानंद शहारे - गोंदिया

कृषी विभागाने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जमिनीच्या क्षेत्रनिहाय विविध पिकांच्या लागवडीसाठी नियोजन केले आहे. यात भातपिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून इतर पिकांचे मिळून यंदाचे नियोजित लागवड क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर राहणार आहे. कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील विविध पिकांसाठी सरासरी क्षेत्र व नियोजित क्षेत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना अनुदानाच्या विविध योजना १६ मे नंतर कृषी विभागाला उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर पिकासाठी सरासरी क्षेत्र ५३१० हेक्टर असून ७४०० हेक्टर क्षेत्र त्यासाठी नियोजित करण्यात आले आहे. मूंग पिकाचे सरासरी क्षेत्र ६० हेक्टर असून यंदाचे नियोजित क्षेत्र १०० हेक्टर आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र १७० हेक्टर असून यंदाचे नियोजित क्षेत्र १०० हेक्टर आहे. तीळ पिकाचे सरासरी क्षेत्र ११४० असून यंदाचे नियोजित क्षेत्र १२०० हेक्टर आहे. भाजीपाला व इतर पिकांसाठी सरासरी क्षेत्र शून्य आहे तर यंदा १२०० हेक्टर जमिनीत भाजीपाला व इतर पिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. ऊसासाठी जिल्ह्यात ३५० हेक्टर क्षेत्र सरासरी असून यंदाचे नियोजित क्षेत्र १२०० हेक्टर आहे. बियाण्यांचेही नियोजनही करण्यात आले असून त्यासंबंधीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यात गोंदिया तालुक्यासाठी महाबीज ३६५६ क्विंटल व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५४०६ क्विंटल बियाणे, तिरोडा तालुक्यासाठी महाबीज ३५६६ क्विंटल व खासगी १७०० क्विंटल असे एकूण ५२५६ क्विंटल, आमगाव तालुक्यासाठी महाबीज ३५४५ क्विंटल व खासगी १६५० क्विंटल असे एकूण ५१९५ क्विंटल बियाणे, गोरेगाव तालुक्यासाठी महाबीज ३०४६ क्विंटल व खासगी १६०० क्विंटल असे एकूण ४६४३ क्विंटल बियाणे, सडक/अर्जुनी तालुक्यासाठी महाबीज ३५५७ क्विंटल महाबीज व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५३०७ क्विंटल बियाणे लागणार आहेत. अर्जुनी/मोरगाव तालुक्यासाठी महाबीज ३५४७ क्विंटल व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५२९७ क्विंटल बियाणे, सालेकसा तालुक्यासाठी महाबीज ३३५६ क्विंटल व खासगी १५०० क्विंटल असे एकूण ४८९५ क्विंटल बियाणे व देवरी तालुक्यासाठी महाबीज ३३५६ क्विंटल व खासगी १६३५ क्विंटल असे एकूण ४९९१ क्विंटल बियाण्यांची मागणी तालुकानिहाय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांसाठी महाबीज २७६६५ क्विंटल व खासगी १३३३५ क्विंटल असे एकूण ४१ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.