शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

२७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:50 IST

राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही.

ठळक मुद्देकेवळ २६ गावांत १०० टक्के कामे : आठ गावांमध्ये प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही. तब्बल २७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान मागासल्याचे चित्र आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये ९४, २०१६-१७ मध्ये ७७ व सन २०१७-१८ मध्ये ६३ गावांची निवड करण्यात आली होती. अभियानाला पहिल्या दोन वर्षांत मोठे यश मिळाले. मात्र यानंतर अभियानाची गती खूप मंदावली आहे.मागील वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील १०-१०; देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील ७-७ तसेच आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ६-६ गावांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व निवडलेल्या गावांपैकी केवळ २६ गावांमध्येच १०० टक्के काम झाले आहे. १० गावांमध्ये ८० टक्के काम झाले आहे. तर २७ गावे असे आहेत, जेथील काम ५० टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातील दोन गावांत ३० टक्के, ८ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गोंदिया तालुक्यातील एका गावात अजुनही काम सुरू करण्यात आले नाही.सन २०१७-१८ मध्ये १९९१ कामांना अभियानांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. यापैकी कृषी विभाग १४३८, जि.प. लघू सिंचन विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु १३५९ कामांना सुरूवात करण्यात आली. यात कृषी विभागाचे ९६८, जि.प. लघू सिंचन विभाग १४०, पंचायत समितीच्या ११७ कामांचा समावेश आहे.जलसंधारण विभाग व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे आतापर्यंत काम सुरू करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आला नाही. दोन्ही विभागाद्वारे एकही काम करण्यात आला नाही. तर वन विभागाचे सर्व १३४ कामे सुरु आहेत.वन विभागाचे ५० कामे पूर्ण झाले आहेत, तर ८४ कामे प्रगतीपथावर आहेत. कृषी विभागाचे ७११, जि.प. लघू सिंचन विभागाचे ४५, पंचायत समितीचे ११३ कामे पूर्ण झाले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये कृषी विभाग २५७, जि.प. लघू सिंचन विभाग ९५ व पंचायत समितीच्या ४ कामांचा समावेश आहे.११.६३ कोटींचा झाला खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख १५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी कृषी विभागाद्वारे सर्वाधिक ५ कोटी ३० लाख १७ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभागाद्वारे ३ कोटी ६५ लाख ६९ हजार रूपये, पंचायत समितीद्वारे २ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांचा समावेश आहे. तर प्रस्तावित १९९१ कामांवर ७१ कोटी ८६ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहेत. यात कृषी विभाग ४२ कोटी ३३ लाख २९ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभाग १९ कोटी २५ लाख ४१ हजार रूपये, पंचायत समिती ५ कोटी ०८ लाख ५० हजार रूपये, जलसंधारण १ कोटी २१ लाख २४ हजार रूपये, वन विभाग ३ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ३८ लाख ०९ हजार रूपयांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार