शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

२७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:50 IST

राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही.

ठळक मुद्देकेवळ २६ गावांत १०० टक्के कामे : आठ गावांमध्ये प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही. तब्बल २७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान मागासल्याचे चित्र आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये ९४, २०१६-१७ मध्ये ७७ व सन २०१७-१८ मध्ये ६३ गावांची निवड करण्यात आली होती. अभियानाला पहिल्या दोन वर्षांत मोठे यश मिळाले. मात्र यानंतर अभियानाची गती खूप मंदावली आहे.मागील वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील १०-१०; देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील ७-७ तसेच आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ६-६ गावांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व निवडलेल्या गावांपैकी केवळ २६ गावांमध्येच १०० टक्के काम झाले आहे. १० गावांमध्ये ८० टक्के काम झाले आहे. तर २७ गावे असे आहेत, जेथील काम ५० टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातील दोन गावांत ३० टक्के, ८ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गोंदिया तालुक्यातील एका गावात अजुनही काम सुरू करण्यात आले नाही.सन २०१७-१८ मध्ये १९९१ कामांना अभियानांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. यापैकी कृषी विभाग १४३८, जि.प. लघू सिंचन विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु १३५९ कामांना सुरूवात करण्यात आली. यात कृषी विभागाचे ९६८, जि.प. लघू सिंचन विभाग १४०, पंचायत समितीच्या ११७ कामांचा समावेश आहे.जलसंधारण विभाग व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे आतापर्यंत काम सुरू करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आला नाही. दोन्ही विभागाद्वारे एकही काम करण्यात आला नाही. तर वन विभागाचे सर्व १३४ कामे सुरु आहेत.वन विभागाचे ५० कामे पूर्ण झाले आहेत, तर ८४ कामे प्रगतीपथावर आहेत. कृषी विभागाचे ७११, जि.प. लघू सिंचन विभागाचे ४५, पंचायत समितीचे ११३ कामे पूर्ण झाले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये कृषी विभाग २५७, जि.प. लघू सिंचन विभाग ९५ व पंचायत समितीच्या ४ कामांचा समावेश आहे.११.६३ कोटींचा झाला खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख १५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी कृषी विभागाद्वारे सर्वाधिक ५ कोटी ३० लाख १७ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभागाद्वारे ३ कोटी ६५ लाख ६९ हजार रूपये, पंचायत समितीद्वारे २ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांचा समावेश आहे. तर प्रस्तावित १९९१ कामांवर ७१ कोटी ८६ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहेत. यात कृषी विभाग ४२ कोटी ३३ लाख २९ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभाग १९ कोटी २५ लाख ४१ हजार रूपये, पंचायत समिती ५ कोटी ०८ लाख ५० हजार रूपये, जलसंधारण १ कोटी २१ लाख २४ हजार रूपये, वन विभाग ३ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ३८ लाख ०९ हजार रूपयांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार