शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

२७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:50 IST

राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही.

ठळक मुद्देकेवळ २६ गावांत १०० टक्के कामे : आठ गावांमध्ये प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही. तब्बल २७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान मागासल्याचे चित्र आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये ९४, २०१६-१७ मध्ये ७७ व सन २०१७-१८ मध्ये ६३ गावांची निवड करण्यात आली होती. अभियानाला पहिल्या दोन वर्षांत मोठे यश मिळाले. मात्र यानंतर अभियानाची गती खूप मंदावली आहे.मागील वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील १०-१०; देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील ७-७ तसेच आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ६-६ गावांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व निवडलेल्या गावांपैकी केवळ २६ गावांमध्येच १०० टक्के काम झाले आहे. १० गावांमध्ये ८० टक्के काम झाले आहे. तर २७ गावे असे आहेत, जेथील काम ५० टक्क्यांपर्यंत झाले आहे. यातील दोन गावांत ३० टक्के, ८ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गोंदिया तालुक्यातील एका गावात अजुनही काम सुरू करण्यात आले नाही.सन २०१७-१८ मध्ये १९९१ कामांना अभियानांतर्गत मंजुरी देण्यात आली होती. यापैकी कृषी विभाग १४३८, जि.प. लघू सिंचन विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु १३५९ कामांना सुरूवात करण्यात आली. यात कृषी विभागाचे ९६८, जि.प. लघू सिंचन विभाग १४०, पंचायत समितीच्या ११७ कामांचा समावेश आहे.जलसंधारण विभाग व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे आतापर्यंत काम सुरू करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आला नाही. दोन्ही विभागाद्वारे एकही काम करण्यात आला नाही. तर वन विभागाचे सर्व १३४ कामे सुरु आहेत.वन विभागाचे ५० कामे पूर्ण झाले आहेत, तर ८४ कामे प्रगतीपथावर आहेत. कृषी विभागाचे ७११, जि.प. लघू सिंचन विभागाचे ४५, पंचायत समितीचे ११३ कामे पूर्ण झाले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये कृषी विभाग २५७, जि.प. लघू सिंचन विभाग ९५ व पंचायत समितीच्या ४ कामांचा समावेश आहे.११.६३ कोटींचा झाला खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख १५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी कृषी विभागाद्वारे सर्वाधिक ५ कोटी ३० लाख १७ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभागाद्वारे ३ कोटी ६५ लाख ६९ हजार रूपये, पंचायत समितीद्वारे २ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांचा समावेश आहे. तर प्रस्तावित १९९१ कामांवर ७१ कोटी ८६ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहेत. यात कृषी विभाग ४२ कोटी ३३ लाख २९ हजार रूपये, जि.प. लघू सिंचन विभाग १९ कोटी २५ लाख ४१ हजार रूपये, पंचायत समिती ५ कोटी ०८ लाख ५० हजार रूपये, जलसंधारण १ कोटी २१ लाख २४ हजार रूपये, वन विभाग ३ कोटी ५९ लाख ९१ हजार रूपये व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ३८ लाख ०९ हजार रूपयांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार