शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

रब्बीसाठी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाने दिला नकार, कोटजंभूरा येथील शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:34 IST

पाटबंधारे विभागाने ऐनवेळी पाणी देण्यास दिला नकार : रोवण्या अर्धवट, पन्हे करपले

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील कुणबीटोला आणि कोटजंभुरा परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे देण्याचे मंजूर करून सुरुवातीला दोनदा पाणी देण्यात आले. मात्र, आता ऐनवेळी पाटबंधारे विभागाने रब्बीसाठी पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे परिसरातील शेतकरी संकटात आले आहे. ५० एकरांतील रोवणी खोळंबली असून पाण्याअभावी पन्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, शेतकरी संकटात आले असून रब्बीसाठी केलेला खर्च कसा भरून निघणार याची चिंता सतावीत आहे.

पुजारीटोला धरणातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या मोठ्या कालव्यातून लटोरी गावाकडे जाणारा छोटा कालवा गेला आहे. या कालव्यात कोटजंभुरा गावापर्यंत आठव्या आऊटलेटपर्यंत उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याची मंजुरी सिंचन विभागाने दिली होती. त्यानुसार त्या ठिकाणी कालवा आडवा बांधण्यात आला. सुरुवातीला दोन वेळा पाणी सोडण्यात आले. त्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी पन्हे टाकले तर नंतर दोन-तीन शेतकऱ्यांनी कसेबसे रोवणीचे काम पूर्ण केले; परंतु जेव्हा तिसऱ्यांदा कालव्याला पाणी सोडण्याची वेळ आली तेव्हा सिंचन विभागाने पाचव्या आउटलेटपर्यंतच पाणी अडविले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे पाणी देण्यास नाकारले आहे. परिणामी, ५० एकरांतील रोवणी संकटात आली आहे. या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मागील १५ दिवस सतत धावपळ केली; परंतु या शेतकऱ्यांची वेदना कुणीच ऐकण्यास तयार नाही. परिणामी, टाकलेले पन्हे पाण्याअभावी वाळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :farmingशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgondiya-acगोंदिया