शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रब्बीसाठी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाने दिला नकार, कोटजंभूरा येथील शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:34 IST

पाटबंधारे विभागाने ऐनवेळी पाणी देण्यास दिला नकार : रोवण्या अर्धवट, पन्हे करपले

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील कुणबीटोला आणि कोटजंभुरा परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे देण्याचे मंजूर करून सुरुवातीला दोनदा पाणी देण्यात आले. मात्र, आता ऐनवेळी पाटबंधारे विभागाने रब्बीसाठी पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे परिसरातील शेतकरी संकटात आले आहे. ५० एकरांतील रोवणी खोळंबली असून पाण्याअभावी पन्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, शेतकरी संकटात आले असून रब्बीसाठी केलेला खर्च कसा भरून निघणार याची चिंता सतावीत आहे.

पुजारीटोला धरणातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या मोठ्या कालव्यातून लटोरी गावाकडे जाणारा छोटा कालवा गेला आहे. या कालव्यात कोटजंभुरा गावापर्यंत आठव्या आऊटलेटपर्यंत उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याची मंजुरी सिंचन विभागाने दिली होती. त्यानुसार त्या ठिकाणी कालवा आडवा बांधण्यात आला. सुरुवातीला दोन वेळा पाणी सोडण्यात आले. त्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी पन्हे टाकले तर नंतर दोन-तीन शेतकऱ्यांनी कसेबसे रोवणीचे काम पूर्ण केले; परंतु जेव्हा तिसऱ्यांदा कालव्याला पाणी सोडण्याची वेळ आली तेव्हा सिंचन विभागाने पाचव्या आउटलेटपर्यंतच पाणी अडविले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे पाणी देण्यास नाकारले आहे. परिणामी, ५० एकरांतील रोवणी संकटात आली आहे. या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मागील १५ दिवस सतत धावपळ केली; परंतु या शेतकऱ्यांची वेदना कुणीच ऐकण्यास तयार नाही. परिणामी, टाकलेले पन्हे पाण्याअभावी वाळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :farmingशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgondiya-acगोंदिया