शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

बेरडीपार नळयोजनेच्या कामात अनियमितता

By admin | Updated: May 10, 2014 00:21 IST

तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे पूरक पाणी योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा योजनेंतर्गत २०१३-१४ साठी नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

काचेवानी : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे पूरक पाणी योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा योजनेंतर्गत २०१३-१४ साठी नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकिंग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी बेरडीपारचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डॉ.गणेश कोल्हटकर यांनी केली आहे. बेरडीपार येथे २००४ मध्ये प्रादेशिक पाणी पूरवठा योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेचा जलकुंभ चार किमी अंतरावर असून, नियमितपणे पाईप लाईनमध्ये बिघाड येत असल्याने नळ योजना कधी बंद तर कधी सुरू राहत होती. याकरिता पूरक पाणी योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा योजनेंतर्गत ९५ लाख रुपयाची तरतूद करून कार्यान्वित करण्यात आली. या कामात जलकुंभ (विहीर) तयार करणे आणि गावात नळाची व्यवस्था करण्यासाठी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. बेरडीपार हे ५१५ कुटुंबांचे गाव असून एकूण लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठीच अडचण आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयीकरिता नळ योजनेचे काम नागपूर येथील सातपुते नामक कंत्राटदाराला असून त्याने पाईप लाईन तयार करताना अनियमितता आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप डॉ. गणेश कोल्हटकर यांनी केला आहे. कोल्हटकर यांनी सांगितले की, पाईप लाईन ही तात्पुरती नसून दिर्घकालीन आहे. त्यामुळे पाईप लाईन घालताना काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. पाईप लाईन घालताना कमीतकमी ३ फुटाची खोली असणे गरजेचे आहे. त्यातील माती काढून रेती घालून, नंतर पाईप घालावे लागयते. परंतु कंत्राटदाराने असे काहीही केले नाही. जेसीबीने माती खोदून त्याठिकाणी पाईप घातले आहेत. गावात विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत अशीच स्थिती असल्याचे कोल्हटकर यांनी सांगितले. पाईप लाईनचे खोदकाम सुरू असताना दीड ते दोन फूट खोली दिसून आल्यावर डॉ. गणेश कोल्हटकर यांनी खोदकाम थांबविण्याची सूचना जेसीबी चालकांना दिली. मात्र काम थांबविण्यात आले नाही. यात सरपंच आणि कंत्राटदार यांची साठगाठ असल्याचा आरोप गणेश कोल्हटकर यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप, खोदकामात अनियमितता, पाईप घालताना कसलीही काळजी न घेणे अशा अनेक चुका केल्या जात आहेत. याबाबत विचारल्यावर सरपंच बेजबाबदारपणाचे उत्तरे देवून ठेकेदार कोण आहेत? दूृरध्वनी क्रमांक नाही. कामाच्या वेळी आपण उपस्थित नव्हतो. असे बेजबाबदारीचे उत्तर सरपंच प्रकाश ठाकरे देत असल्याचे ग्रा.पं. सदस्य व माजी सरपंच गणेश कोल्हटकर यांनी लोकमतला सांगितले आहे. (वार्ताहर)