सावकारी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय
By Admin | Updated: August 26, 2015 01:50 IST2015-08-26T01:50:53+5:302015-08-26T01:50:53+5:30
सावकारी पाशातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी प्रत्येक्षात अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे.

सावकारी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय
करडी (पालोरा) : सावकारी पाशातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी प्रत्येक्षात अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे. आजही शेतकरी कर्जात अडकलेले आहेत.
राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांनी आपले कडील सोने तारण म्हणून सावकाराकडे गहाण ठेवून कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्याचे सावकारी कर्ज माफ करण्याचे निर्णय घेतले आहे. परंतू आजही अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील जवळच्या सहकारी बँकाकडून आपल्याकडील सोने तारण ठेवून शेतीकरिता कर्ज घेतले अशा शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे.
जगाचा पोशींदा असलेल्या बळीराजा केवळ सावकाराकडून कर्ज घेवून आत्महत्या करतो, ही बाब संवेदनशील मनाला हेलावून सोडणारी आहे. बळीराजाची सावकारी पाशातून सुटका करण्यसााठी राज्य शासनाने ठोस पावले उचलले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असले तरी तेवढ्याच प्रमाणात इतर बँकाकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे हे शासनाच्या व प्रतिनिधींच्या लक्षात येत नाही काय, सावकाराकडे सोने तारण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेशही निघाले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे सोने तारण ठेवून कर्ज उचल केले आहे. अशा शेतकऱ्यांची अधीकृत नोंद त्या बँकेकडून घेतली नाही व शासनापर्यंत पोहचती केली नाही या धोकामुळे शेतकऱ्यांचा बळी जावू शकतो. शासनाने अनेक शेतकऱ्यावर अन्याय करून दिशाभूल केले जात आहे. आजघडीला सहकारी बँकेतून अनेक शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून शेतीकरिता कर्ज घेतलेला आहे. अशा शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष दिसत नाही.
राज्यात अनेक बँकाकडून शेतकरी ७/१२ घेवून सोने तारण करून कर्ज घेत आहेत. अशा बँकेकडून शेतकऱ्याची माहिती घेवून सावकारी कर्जबरोबर बँकेकडून सोने तारण कर्जाची कर्जमाफी करण्यात यावी ही काळाची गरज आहे. तेव्हाच खरा बळीराजा सावकारी कर्जापासून मुक्त होईल, अशी मागणी पालोरा पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे, किरण भोयर आदिंनी केली आहे.(वार्ताहर)