धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 3, 2014 23:30 IST2014-09-03T23:30:36+5:302014-09-03T23:30:36+5:30

धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा

Inflammation of Khapakidi and Karapa diseases on the Dhanpika | धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

काचेवानी : धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.
सद्यस्थितीत कृषी विभागाचा सल्ला घेण्याकरिता आणि कृषी विभागात आलेल्या योजनांची माहिती घेण्याकरिता कृषी विभागाच्या कार्यालयात दिवसभर शेकडो शेतकरी हजेरी लावत असल्याचे दिसून येते. तिरोडा तालुक्यात सर्वत्र खोडकिडी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळत असल्याचे तिरोडा कृषी विभागाचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी सांगितले.
सद्यस्थितीत शासनाकडून कृषी विभागाकडे कोणत्याही प्रकारच्या कीडनाशक आणि रोगनाशक औषधी पुरविण्यात आल्या नाहीत. औषधीची मागणी करण्यात आली आहे. त्या उपलब्ध होताच शेतकऱ्यांपर्यंत पुरविल्या जातील, असेही पर्यवेक्षक पारधी यांनी लोकमतला सांगितले आहे.
खोडकिडी ही धान पिकांसाठी विनाशकारी असून नियंत्रणाकरिता फ्लोरोपायरीकॉस किंवा क्विनापफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी. या व्यतिरिक्त कारटॉप हायड्रोक्लोराईड पाच किलो किंवा परटेला पाच किलो प्रति एकर वापरावे. तसेच कडाकरपा आणि करपा रोगाकरिता कॉब्रेन्डेझिम कॉपर आॅक्झीक्लोराईड यात स्टेटरोसायक्लीन २५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी औषधांची गरज पडते. कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या औषधी स्वस्त दरात मिळत असल्याने सर्वसाधारण शेतकऱ्यांकरिता त्या महत्वाच्या असतात. मात्र कृषी विभागाकडून मिळणाऱ्या औषधी कधीही वेळेवर देण्यात येत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.
तालुका कृषी विभागाने पीक लावणीच्या वेळी किंवा मे व जून महिन्यात संभावित कीड व रोगनाशक औषधीची मागणी केली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती औषधी लागली असती. मात्र कृषी विभाग निष्काळजीपणा करुन उशीरा मागणी करीत असल्याने वेळेवर शेतकऱ्यांना औषधी पुरविली जात नाही.
खासगी औषधी विक्रेते आणि कृषी विभागाचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग औषधांची मागणी उशीरा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी बाजारातून विकत घेण्याची पाळी आली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना दरिद्र बनवून व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांकरिता स्वस्त दरात औषधी उपलब्ध करुन देण्याची शेतकऱ्यांनी कृषी विभागाला मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Inflammation of Khapakidi and Karapa diseases on the Dhanpika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.