शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

नक्षलवाद्यांशी लढणारी भारत बटालियन सात वर्षापासून नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:00 AM

सन २००९ मध्ये भारत राखीव बटालीयन २, राज्य राखीव पोलीस बल गट १५ बिरसी-गोंदिया या नावाने ६७५ युवकांची भर्ती करुन जवानांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण नानविज पुणे येथे देण्यात आले. त्यानंतर निवासाची व्यवस्था गोंदिया येथे न झाल्याने ही बटालीयन प्रशिक्षणानंतर ठेवायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा या बटालियनचे तत्कालीन सेवानिवृत्त समादेशक कोसे यांनी बटालीयनची तात्पुरत्या स्वरुपात राज्य राखीव पोलीस बल गट १२ हिंगोली येथे राहण्याची व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देसंडे अँकर। ५५ कोटीची इमारत रिकामी, स्वार्थासाठी अधिकारी गोंदियाला येत नाहीत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी व इतर कृत्यांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने शासनाने भारत बटालियन १० वर्षापूर्वी तयार केली. परंतु तयार झाल्यापासून ही बटालीयन गोंदियाच्या नावाने असूनही हिंगोली व नागपूर येथेच आहे. नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या बटालियनच्या जवानांना गोंदियात ठेवण्यापेक्षा अधिकारी आपल्या स्वार्थापोटी नागपूरातच ठेवत असल्याचे दिसते.सन २००९ मध्ये भारत राखीव बटालीयन २, राज्य राखीव पोलीस बल गट १५ बिरसी-गोंदिया या नावाने ६७५ युवकांची भर्ती करुन जवानांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण नानविज पुणे येथे देण्यात आले. त्यानंतर निवासाची व्यवस्था गोंदिया येथे न झाल्याने ही बटालीयन प्रशिक्षणानंतर ठेवायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा या बटालियनचे तत्कालीन सेवानिवृत्त समादेशक कोसे यांनी बटालीयनची तात्पुरत्या स्वरुपात राज्य राखीव पोलीस बल गट १२ हिंगोली येथे राहण्याची व्यवस्था केली होती. या बटालीयनमध्ये गोंदिया व भंडारा येथील ३५० युवक आहेत. तर उर्वरीत युवक विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत.गोंदियातील कर्मचाऱ्यांना हिंगोली हे ५०० किमी. दूर होत असल्याने कोसे यांनी ही बटालीयन राज्य राखीव पोलीस बल गट ०४ नागपूर या ठिकाणी २७ जानेवारी २०१३ रोजी हलविली. तेव्हा पासून ही बटालीयन नागपूर येथे तात्पुरत्या स्वरुपात आहे. गोंदिया जिल्हा नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असल्याने नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी ही भारत बटालीयन उभारण्यात आली. नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी उत्पात केला, हिंसक घटना घडविल्या अशावेळी पोलिसांच्या मदतीला ही भारत बटालीयन नक्षलग्रस्त भागात जाऊन काम करणार होती. मात्र नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी उभारण्यात आलेली ही बटालीयन अधिकाऱ्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे ही नागपूरातच आहे.या बटालीयनसाठी हक्काची सुसज्ज इमारत उभी असतानाही अधिकारी या बटालीयनला गोंदियात का घेऊन येत नाही हा मोठा प्रश्न आहे. अधिकाºयांचे वेतन सुरूच आहे, कर्मचाºयांनाही वेतन मिळत आहे. मात्र कवडीचे काम नसताना नागपूरात ही बटालीयन ठेवण्यामागील अधिकाºयांचा हेतू फक्त आपल्या स्वार्थापुरता आहे. अधिकारी नागपुरात स्थायीक झाल्याने आता ही बटालीयन नागपूरातून हलू नये असे त्यांचे प्रयत्न असतात. परिणामी ज्या उद्देशातून ही बटालीयन उभारण्यात आली त्या उद्देशाला तिलांजली देण्याचे काम या बटालीयनचे वरिष्ठ अधिकारी करीत असतात.गोंदियाचा बुडतो २० लाखांचा रोजगारभारत बटालियनमध्ये ९३९ अधिकारी-कर्मचारी आहेत. यात ३० अधिकारी, ६७५ पोलीस शिपाई, १६० हवालदार, १८ एएसआय, ५० अनुगामी कर्मचारी, ६ लिपीक आहेत. ही बटालियन १० वर्षापासून बाहेर आहे. जर गोंदिया येथे एवढे कर्मचारी आले तर २० लाख रुपये महिन्याची खरेदी गोंदिया शहरातून झाली असती. या जवानांमुळे परिसरातील जनतेला रोजगार मिळाला असता. ही बटालियन गोंदिया येथे लवकर यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.‘एचआरए’ कपात कराइमारत नसल्यामुळे नागपूरात भारत बटालीयन ठेवली तेव्हापर्यंत ठिक आहे. परंतु ५५ कोटी खर्च करूनही या इमारतीत भारत बटालीयनला आणण्यासाठी अधिकारी नसतील तर सर्व अधिकारी कर्मचाºयांचे घरभाडे व सर्व भत्ते कपात करा. सोबतच ही बटालीयन गोंदियाला आणण्यासाठी काय अडचण आहे यासाठी कारणे दाखवा नोटीस वरिष्ठांनी बजाविण्याची गरज आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी