शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे दिलासा : तरीही २५७ मिमी पावसाची तूट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील २-३ दिवस संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा सातत्याने वाढत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप अपेक्षेच्या तुलनेत पाऊस बरसलेला नसल्याने २५७ मीमी. पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची गरज आहे.मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे. मात्र गुरूवारी (दि.१३) दुपारपासून पावसाने उघाड दिली आहे.मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ५२.३० टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ६९.१८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ४४.२४ टक्के तर कालीसरार प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली. शिवाय प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. असे असताही मात्र अद्याप २५७ मीमी पावसाची तूट कायम आहे.जिल्ह्यात १४ आॅगस्ट पर्यंत ८६९.६ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र यंदा आतापर्यंत ६१२.८१ सरासरी पाऊस बरसलेला आहे.पुजारीटोला प्रकल्पाची दारे उघडण्याची शक्यतापाटबंधारे विभागातील नियमांनुसार १५ आॅगस्टपर्यंत प्रकल्पांत ७४ टक्के जलसाठा ठेवायचा असून त्यापेक्षा जास्त होत असल्याचे पाणी सोडावे लागते. त्यानुसार, पुजारीटोला प्रकल्पात १४ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत ६९.१८ टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली असून त्यात वाढ होत आहे. अशात पाऊस बरसल्यास जलसाठ्यात वाढ होणार असल्याने दार उघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.आणखीही दमदार पावसाची गरजमागील ४-५ दिवसांत बरसलेल्या पावसामुळे आता कुठे जिल्ह्यात पाऊस बरसल्यासारखे वाटत आहे. सुरूवातीचे जून व जुलै हे २ महिने कोरडेच गेल्याने तेव्हापासूनच जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. आताही जिल्ह्यात पावसाची तूट कायम असून त्याची सरासरी २५७ एवढी आहे. आताही सरासरी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात आणखीही दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस