शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे दिलासा : तरीही २५७ मिमी पावसाची तूट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील २-३ दिवस संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा सातत्याने वाढत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप अपेक्षेच्या तुलनेत पाऊस बरसलेला नसल्याने २५७ मीमी. पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची गरज आहे.मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे. मात्र गुरूवारी (दि.१३) दुपारपासून पावसाने उघाड दिली आहे.मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ५२.३० टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ६९.१८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ४४.२४ टक्के तर कालीसरार प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली. शिवाय प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. असे असताही मात्र अद्याप २५७ मीमी पावसाची तूट कायम आहे.जिल्ह्यात १४ आॅगस्ट पर्यंत ८६९.६ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र यंदा आतापर्यंत ६१२.८१ सरासरी पाऊस बरसलेला आहे.पुजारीटोला प्रकल्पाची दारे उघडण्याची शक्यतापाटबंधारे विभागातील नियमांनुसार १५ आॅगस्टपर्यंत प्रकल्पांत ७४ टक्के जलसाठा ठेवायचा असून त्यापेक्षा जास्त होत असल्याचे पाणी सोडावे लागते. त्यानुसार, पुजारीटोला प्रकल्पात १४ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत ६९.१८ टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली असून त्यात वाढ होत आहे. अशात पाऊस बरसल्यास जलसाठ्यात वाढ होणार असल्याने दार उघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.आणखीही दमदार पावसाची गरजमागील ४-५ दिवसांत बरसलेल्या पावसामुळे आता कुठे जिल्ह्यात पाऊस बरसल्यासारखे वाटत आहे. सुरूवातीचे जून व जुलै हे २ महिने कोरडेच गेल्याने तेव्हापासूनच जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. आताही जिल्ह्यात पावसाची तूट कायम असून त्याची सरासरी २५७ एवढी आहे. आताही सरासरी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात आणखीही दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस