६० घटनांत कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात
By Admin | Updated: June 15, 2016 02:18 IST2016-06-15T02:18:03+5:302016-06-15T02:18:03+5:30
वर्ष २०१६ काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही ठरले आहे. या वर्षातील गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात आगीच्या ६० घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे.

६० घटनांत कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात
साडेपाच महिन्यातील आगी : ३३ घटना शहराबाहेरील
कपिल केकत गोंदिया
वर्ष २०१६ काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही ठरले आहे. या वर्षातील गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात आगीच्या ६० घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या यात कित्येकांची रोजीरोटी हिरावल्या गेली तर अनेकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दोन कोटींच्या वर मालमत्ता जळून खाक झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने घेतली आहे.
आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तिशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते, तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानता बाळगली तरीही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात सन २०१६ च्या सुरूवातीच्या साडेपाच महिन्यांत आगीच्या ६० घटना घडल्या आहेत.
या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या ६० घटनांतील ३३ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. त्यात घर, दुकान, टपऱ्यांसोबत उद्योगांनाही आगी लागल्याची नोंद आहे. मात्र त्यात घरे जळण्याच्या घटना जास्त असल्याने अग्नितांडवात कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले, तर कित्येकांची रोजीरोटी भस्मसात झाली आहे.
साडेपाच महिन्यांत घडलेल्या या घटनांमध्ये गोरेगाव तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथील राईस मीलमध्ये आग लागल्याची सर्वात मोठी घटना घडली आहे. ६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याची नोंद आहे.