मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:17+5:302021-08-24T04:33:17+5:30

गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखे आपलेही नावलौकिक व्हावे, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाचगाणे ऐकत ...

I left home to go to Mumbai and become a hero! | मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर!

मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर!

गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखे आपलेही नावलौकिक व्हावे, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाचगाणे ऐकत व त्याचे प्रात्याक्षिक करत मुंबईची रस्ता धरणाऱ्या अनेक मुला-मुलींना रेल्वेस्थानकावर पकडण्यात आले. जिल्हा पोलिसांनीही अनेकदा ऑपरेशन मुस्कानच्या मोहिमेत घरातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना रेल्वेस्थानक व बसस्थानकावरून पकडून पालकांच्या स्वाधीन केले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मुलामुलींनी मुंबईला हिरो बनण्यासाठी आपले घर सोडून मुंबईदेखील गाठली आहे. काही मुले-मुली बेपत्ता होता तर काही मुले-मुली स्वत:हून घर सोडून देतात. गोंदिया जिल्ह्यातून हरविलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुला-मुलींना ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पकडून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

.......................

कोणाला बंगला, गाडीचे आकर्षण, तर कोणाला घरातील वादाचा कंटाळा

- बहुतांश मुला-मुलींना आपला बंगला असावा, गाडी असावी असे आकर्षण असल्याने ते याचा ध्यास ठेवून घराबाहेर पडतात.

- घराबाहेर पडल्याशिवाय आपला विकास होणार नाही, जग कसे आहे हे घराबाहेर पडल्यानंतरच कळेल असे समजून मुले-मुली बाोर पडतात.

- घरात आईवडिलांचा सतत होणारा वाद, त्यांची कटकट यामुळे घर सोडून अनेक मुले घरातून बाहेर पडतात.

...............

म्हणून घर सोडले....

आपल्याला अभिनेत्री व्हायचे आहे. आईवडिलांच्या संमतीने आपण घराबाहेर पडले. मुंबईत नाटक, चित्रपटात काम करून आपलेही नाव समाजात मोठे करील या आशेने मुंबईला गेली. काही वर्षे काम केले, परंतु तिथे कुणाची मदत होत नसल्याने मी परत आली, असे एका मुलीने म्हटले आहे.

.............

मला सिनेमात काम करायचे आहे म्हणून गोंदिया सोडून मुंबई गाठली.

अनेक सिनेमात व सीरियलमध्ये काम करून आपले नाव मोठे करण्याचे स्वप्न रंगवित आहे. कामाला जोमाने सुरुवातही झाली. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. आता गाडी पुन्हा हळूहळू सुरू झाली आहे, असे एका गोंदियातील तरुणाने सांगितले.

.............

मिळालेली बालके चाईल्ड लाइनच्या स्वाधीन

रेल्वेस्थानकावर दरराेज बंदोबस्त लावला जातो. या बंदोबस्तादरम्यान रेल्वेस्थानकावर एकटा मुलगा किंवा मुलगी असेल तर आमच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून विचारपूस केली जाते. आम्हाला वाटले की मुलगा-मुलगी घर सोडून आलेत तर त्यांना चाईल्ड लाइनसोबत संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन करण्यात येते.

- नंद बहादूर, रेल्वे सुरक्षा बल अधिकारी गोंदिया.

.....

Web Title: I left home to go to Mumbai and become a hero!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.