शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई झाल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळून मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

ठळक मुद्देकेवळ ४ हजार ३२७ शेतकऱ्यांचे पंचनामे पाठविले : परताव्यासाठी पुन्हा प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील खरीप हंगामात ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील धान पिकाला मोठ्या प्रमाणात बसला. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ४ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तयार करुन विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. मात्र पंचनाम्याच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून ६५ हजार शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात. यासाठी शासनाने विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या विमा कंपन्याची नियुक्ती केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पीक विम्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती शासनाने केली आहे.यातंर्गत जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई झाल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळून मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने याचा फटका धान पिकांना बसला.अनेक शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागले. तर काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघाला नाही. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४२ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना पीक विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश शासनाने दिले.यातंर्गत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील एकूण ४ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन परतावा मिळण्यासाठी पाठविल्याची माहिती आहे.मात्र पीक विमाधारक आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत विमा कंपनीकडे पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ नेमका किती शेतकऱ्यांना मिळणारअसा प्रश्न निर्माण झाला आहे.तीन महिने लोटूनही परतावा नाहीज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान झाले. त्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन विमा प्रतिनिधीने कंपनीकडे तीन महिन्यापूर्वीच पाठविले. मात्र अद्यापही विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यासंदर्भात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी