शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:47 IST

राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम गर्रा येथील आदिवासी जागृती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम गर्रा येथे शनिवारी (दि.२) गोंडवाना आदिवासी समितीच्यावतीने आयोजीत आदिवासी संस्कृती भाषा, साहित्य व सद्भावना जागृती संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश सरकारसोबत लढा दिला. तर दुसरीकडे मागसलेल्या व उपेक्षीत आदिवासी समाजात जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. जल, जमीन व जंगलासाठी आदिवासी समाजाला उभे करून त्यांना आपल्या अधिकारांप्रती जागरूक केले. हेच कारण आहे की, आज अवघ्या जगात त्यांना देवाचा दर्जा मिळाला असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या आदर्शांंतून पे्ररणा घेत आम्ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहोत. विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाच्या विकासासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा आम्ही लढलो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या सर्व योजना आमच्या माध्यमातून आणून समाजाला पुढे आणण्याचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे अतिरीक्त कार्यालय आम्ही गोंदियात सुरू करविले. भविष्यातही आम्ही आपल्या प्रयत्नांत कमी पडणार नसल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य विजय लोणारे, सरपंच डिलेश्वरी येडे, उपसरपंच निर्मला ठाकरे, जी.एस.बरडे, अंकेश हरिणखेडे, मनिष मेश्राम, सुनील राऊत, कल्पना बागडे, राजेश भोयर, सुरेश कुंभरे, श्रीराम टेकाम, धनलाल टेकाम, गुलाब पंधरे, रामकृष्ण पंधरे, राजेश पंधरे, महेश मरसकोल्हे, हिरालाल पंधरे, दारासिंग कुंजाम, विजय पंधरे, तिलकचंद टेकाम, मनोद उईके, भूमेश्वर पंधरे, संजय कोडवानी, उमेश टेकाम, बुधा पंधरे, हौसलाल पंधरे, खेमलाल पंधरे यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.कॉँग्रेस सरकारने दिला सन्मानकॉँग्रेस सरकारने रानी दुर्गावती यांच्या नावाने जबलपूर विश्व विद्यालयाचे नाव ठेवले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेसच्या केंद्र सरकारने जून १९८८ मध्ये टपाल तिकीट जारी केले. जबलपूर येथून सुटणाºया जम्मूतवी रेल गाडीला रानी दुर्गावती यांच्या सन्मानार्थ दुर्गावती एक्स्प्रेम म्हणून नाव देण्यात आले. तर बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ राची विमानतळ व पुरलिया विश्व विद्यालयाचे नाव भगवान बिरसा मुंडा यांच्या नावावर ठेवण्यात आले. देशातील आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा व रानी दुर्गावती यांच्या शौर्याला कॉँग्रेस सरकारने सन्मान देण्याचे कार्य केल्याचे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल