शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:47 IST

राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम गर्रा येथील आदिवासी जागृती संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम गर्रा येथे शनिवारी (दि.२) गोंडवाना आदिवासी समितीच्यावतीने आयोजीत आदिवासी संस्कृती भाषा, साहित्य व सद्भावना जागृती संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश सरकारसोबत लढा दिला. तर दुसरीकडे मागसलेल्या व उपेक्षीत आदिवासी समाजात जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. जल, जमीन व जंगलासाठी आदिवासी समाजाला उभे करून त्यांना आपल्या अधिकारांप्रती जागरूक केले. हेच कारण आहे की, आज अवघ्या जगात त्यांना देवाचा दर्जा मिळाला असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या आदर्शांंतून पे्ररणा घेत आम्ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहोत. विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाच्या विकासासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा आम्ही लढलो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या सर्व योजना आमच्या माध्यमातून आणून समाजाला पुढे आणण्याचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे अतिरीक्त कार्यालय आम्ही गोंदियात सुरू करविले. भविष्यातही आम्ही आपल्या प्रयत्नांत कमी पडणार नसल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य विजय लोणारे, सरपंच डिलेश्वरी येडे, उपसरपंच निर्मला ठाकरे, जी.एस.बरडे, अंकेश हरिणखेडे, मनिष मेश्राम, सुनील राऊत, कल्पना बागडे, राजेश भोयर, सुरेश कुंभरे, श्रीराम टेकाम, धनलाल टेकाम, गुलाब पंधरे, रामकृष्ण पंधरे, राजेश पंधरे, महेश मरसकोल्हे, हिरालाल पंधरे, दारासिंग कुंजाम, विजय पंधरे, तिलकचंद टेकाम, मनोद उईके, भूमेश्वर पंधरे, संजय कोडवानी, उमेश टेकाम, बुधा पंधरे, हौसलाल पंधरे, खेमलाल पंधरे यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.कॉँग्रेस सरकारने दिला सन्मानकॉँग्रेस सरकारने रानी दुर्गावती यांच्या नावाने जबलपूर विश्व विद्यालयाचे नाव ठेवले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेसच्या केंद्र सरकारने जून १९८८ मध्ये टपाल तिकीट जारी केले. जबलपूर येथून सुटणाºया जम्मूतवी रेल गाडीला रानी दुर्गावती यांच्या सन्मानार्थ दुर्गावती एक्स्प्रेम म्हणून नाव देण्यात आले. तर बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ राची विमानतळ व पुरलिया विश्व विद्यालयाचे नाव भगवान बिरसा मुंडा यांच्या नावावर ठेवण्यात आले. देशातील आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा व रानी दुर्गावती यांच्या शौर्याला कॉँग्रेस सरकारने सन्मान देण्याचे कार्य केल्याचे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल